राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.
Similar Posts
ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर…
हिम्मत असेल तर वाराणसीत मोदींना हरवून दाखवा -ममता बेनर्जी यांचे कॉंग्रेसला उघड आव्हान
मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी म्हणाल्या की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ४० जागाही मिळवू शकेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.’पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या…
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?
मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले…
गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
विस्तार स्वातंत्र्य दिना पूर्वी
मुंबई/ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन आता महिना व्हायला आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे नव्या सरकारवर सर्वांकडून टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्य दीना पूर्वी केला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेतशिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
