राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.
Similar Posts
अरेरे, छे छे…काय बोलू आता ? कसं समजावू ?
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग मध्यंतरी माझ्या जवळच्या एका वैद्यमित्राचा एन्जीयोग्राफी आणि लगेचच एन्जीयोप्लास्टी केल्याचा मेसेज एका कौटुंबिक गटात वाचला. आणि उत्स्फूर्तपणे ~तोंडातून,~ बोटातून टाईप झाले…“अरेरे, छे छे, काय बोलू आता, कसं समजावू ?” (हा हन्त हन्त…. स्टाईल) हे तर अगदी काॅमन झाले आहे.बाजारात जाऊन पिकलेला फणस फोडून गरे आणि आठळ्या त्याच्याकडूनच सुटी करून…
बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कामगारांवर सत्ताधारी शिवसेनेकडून अन्याय
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची…
शिवजयंतीच्या मिरवणुकीवरून हैदराबाद बागलकोट मध्ये तणाव
मुंबई/देशातील तीन राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. आझाद चौक क्षेत्रात गुरुवारी रात्री दुर्गा मंदिर परिसरात कथित तोडफोडीच्या वृत्तामुळे तणाव निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्याच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये हे आझाद चौक क्षेत्र आहे. आरती आणि मशिदीत नमाज पठण एकाचवेळी सुरु होतं. याच दरम्यान कुठल्यातरी कारणावरुन वाद सुरु…
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी ‘रायगड टुडे’चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते)…
महाराष्ट्रात प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी येणार
मुंबई : सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. या मागणीला १०५ आमदारांच्या सहीसह पाठिंबा…
भिवंडी कशेळी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यां विरोधात धरणे आंदोलन…
भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष…
