राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.
Similar Posts
दिल्ली बॉम्ब स्फोटापूर्वी दोन दहशतवादी डॉक्टरांमध्ये पैशावरून वाद झाला होता
नवी दिल्ली/राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटाच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. दहशतलादी डॉ. उमर याने केलेल्या आत्मघातकी कार स्फोटात त्याच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला तर २० लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकू काही जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणाकडून कसून तपास सुरू असून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून…
कोचिंग क्लासमध्ये स्फोट २ विद्यार्थी ठार ५ जखमी
फर्रुखाबाद. फर्रुखाबादमध्ये एक मोठा स्फोट झाला. कोचिंग सेंटरमध्ये वर्ग सुरू असताना झालेल्या स्फोटात दोन विद्यार्थी ठार झाले. एका विद्यार्थिनीसह पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आणि कोचिंग सेंटरमध्ये चेंगराचेंगरी झाली.सतनपूर मंडी रोडवरील कटियार कोल्ड स्टोरेजजवळ सन क्लासेस लायब्ररी अँड कोचिंग सेंटर आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीबाहेर मोठा स्फोट झाला….
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार
योजनेतील जाचक अटी काढणार शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई दि १२: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
भारताच्या महिला संघानेही पाकिस्तानला लोळविले – वर्ल्डकप मध्ये पाकवर ८८ धावांनी विजय
कोलंबो/भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला १५९ धावांवर बाद करत मोठा विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना ८८ धावांनी जिंकला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग १२ वेळा विजय मिळवला आहे….
बाळासाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही- उद्धव ठाकरे
मुंबई – निवडणूक जिंकायच्या असतील तर बाळासाहेबांच्या शिवाय पर्याय नाही . हिम्मत असेल तर मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवा असे उघड आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला केले आहे. तसेच गद्दार विकत घेता येऊ शकतात पण गर्दीचे चैतन्य विकत घेता येत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात…
