राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.
Similar Posts
शिंदेंच्या जाहिरातींवरून भाजपात नाराजी
. मुंबई: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले, त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस…
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह
पालघर /पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे. सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
महाराष्ट्रातील सत्तांतर- पालिका सहायक आयुक्ता वर गडांतर
एकाच महिन्यात कुणाची तीनदा तर कुणाची दोनदा बदलीमुंबई/ महाराष्ट्रात सत्तांतर होताच सर्वात प्रथम पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले किरण दिघावकर यांची दोनदा तर मृदुला अंडे यांची तीनदा बदली.सरकार सत्तेवर येताच सर्वात प्रथम सेनेच्या मर्जीतले किरण दिघावकर याना मध्य मुंबईतून हटवून ई विभागात टाकण्यात आले तर पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांची पी उतर…
अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न शिंदेंचा पक्ष लावणार
मुंबई/अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आम्ही लावून देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केलीमुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच मी लोकांसाठी काम…
महापालिकांची नवी आरक्षण सोडत 29 जुलैला
मुंबई / ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे जुनी सोडत रद्द करण्यात आली असून नवी सोडत 29 जुलैला काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत सोडतीचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण…
