मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती व सूचना विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहे २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी होईल असा एकंदरीत कार्यक्रम असून पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग या दोन्हीकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या एकूण रचनेची सुरू झालेली तयारी पाहता आता आता लवकरच निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील सर्व १८ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल असे दिसतेय.
Similar Posts
ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते सांगापंकजा मुंडेंचा सरकारला सवाल – उपोषणकर्त्या हाकेची घेतली भेट
जालना – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करावी. पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी या नेत्यांची आहे….
गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही – जरांगेचा राज्य सरकारला गंभीर इशारा
औरंगाबाद -आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही पण ते आरक्षण टिकलं पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. नाही तर तोच पाढा पुन्हा वाचावा लागेल. सरकार आम्हाला २० तारखेपर्यंत आरक्षण देईल, असे वाटत नाही….
जाहिरातबाजी साठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी का ?
जनतेचा पैसा हा राजकारणासाठी उधळपट्टीचे एक माध्यम असते. कारण त्यांना विचारणारा कोणी नसतो. त्यामुळे या पैशाची कशीही आणि कितीही उधळपट्टी केली तरी राज्यकर्त्यांना काहीही फरक पडत नाही. मात्र हा पैसा कमी पडला, की मग कराच्या माध्यमातून जनतेवर बोजा टाकला जातो. वास्तविक वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली जो निधी मंजूर केला जातो, त्या निधीतील बराचसा पैसा हा…
वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून राजकीय धमासान
मुंबई : केंद्र शासनाच्या वक्फ़ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसारच वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो, असे स्पष्टीकरण…
कर्जमाफीची तारीख जाहीर करा तरच माघार!शेतकरी आंदोलक आक्रमक
नागपूर/बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांकडून नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच…
बच्चू कडूना २ वर्षांची शिक्षा
नाशिक -आमदार बच्चू कडू राज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून२०१७ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी…
