



त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या…
मुंबई /मुंबईत शिरलेल्या मराठा आंदोलकांनी ५ दिवस सरकार आणि मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर, त्यांच्या दबावापुढे सरकार नमले. आणि जरंगेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या .त्यानुसार प्रलंबित जातपडताळणीला मान्यता देण्यात आली आहे.हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे.सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एकामहिन्याची मुदत, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी, आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, आणि सर्वात कळीचा मुद्दा…
मुंबई/ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना आणि भाजपतील वाद शिगेला पोहचला आहे.भाजपच्या ऑपरेशन लोटासमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून वाद मिटवण्याचा कवायत सुरू झाली आहे.राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र नाही. भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका बसू लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला….