कुणी घर देता का रे ? घर ? एका तुफानाला कुणी घर देता का ? हा जगप्रसिद्ध संवाद माझ्या मनात संपूर्ण दिवस घोळत होता आणि त्यात त्या सुप्रसिद्ध लेखकाची क्षमा मागून मला बदल करण्यावाचून रहावलं नाही. ’कुणी डेथ सर्टिफिकेट देतं का माझ्या मामेभावाला कुणी डेथ सर्टिफिकेट ? म्हणजे माझ्या मामाची अंतीम यात्रा तरी निदान सुखाची होईल आणि त्याच्या आत्म्याला सद्गती लाभेल !’ 2019 या वर्षापासून आपल्या भरतवर्षाला कुणाची द्रुष्ट लागलीय कुणास ठाऊक. कोरोना या वैश्विक महामारीच्या खाईत आपला भारत आणि प्राणप्रिय महाराष्ट्र लोटला गेलाय. या दुःखद गर्तेतून या वैभवसंपन्न महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या तमाम मंत्रिमंडळ आणि प्रशासनासह अहोरात्र मेहनत घेत आहेत. एका बाजूला पत्नी रश्मी कोरोनाशी लढा देत आहेत, दुसर्या बाजूला पर्यटन, पर्यावरण मंत्री पुत्र आदित्य कोरोनाबरोबर लढून पुन्हा लोकसेवेला लागले असतांना, चहूबाजूंनी केवळ विरोधासाठी विरोध करणार्या बेजबाबदार विरोधी पक्षाच्या आरोपांच्या फैरींमध्ये धीरोदात्तपणे राज्यशकट हाकत आहेत. कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आपत्तीच्या डोंगराखाली सामान्य माणूस सापडला आहे. या आपत्तीमधून सामान्य माणसाला बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना आपत्ती ही काही जणांसाठी जणू काही इष्टापत्ती ठरतेय की काय ? असा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या गेल्या वर्षभरात सरकारी जमीन, सरकारचे पाणी, सरकारची वीज घेऊन सरकारलाच अंगठा दाखविण्याचे प्रकार घडले आहेत. यावर मोदी आणि ठाकरे सरकारला ’मोठा’ निर्णय घ्यावाच लागेल, असा लेख लिहिला. हा लेख चक्क माजी मंत्र्यांनी वाचून व्वा, मोठा शब्द भावला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात, मला या प्रतिक्रियेपेक्षा मोदी आणि ठाकरे सरकार कडून कठोर निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा होती. गेल्या 27 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी स्वतः ही सूचना बोलून दाखविली होती. एवढा सारा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे आज कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणूस जणू काही अंधारात चाचपडतोय. समोर भेठलेला माणूस, बरोबर फिरणारा माणूस अचानक अंतर्धान पावतो आणि आपली नजर एकदम शून्यात जाते. कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी आजारी माणसाला हात लावायला धजावत नाही. इथवर ठीक आहे. पण जो माणूस हे जग सोडून, इहलोकाची यात्रा संपवून परलोकाची यात्रा आरंभतो त्या माणसाला परलोकीची यात्रा तरी सुखाने करायला मिळावी, अशी सार्थ अपेक्षा बाळगणे निश्चितच चुकीचे ठरणार नाही. पण ही परलोकीची यात्रा या माणसाला कशी सुरु करायला मिळेल ? यासाठी त्याच्या परिवाराकडे मृत्यूचा दाखला म्हणजे ’डेथ सर्टिफिकेट’ असणे अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे. पण या कोरोनाच्या काळात हे डेथ सर्टिफिकेट मिळणेही दुरापास्त झाले आहे. माझे मानलेले मामा मोतीलाल मगनलाल तांबोळी, वय वर्ष 79 हे 16 एप्रिल 2021 च्या पहाटे इहलोकाची यात्रा संपवून परलोकीची यात्रा करायला निघाले. साधारण तासाभरात त्यांनी हालचाल केली आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल जवळ रहाणार्या डॉ. प्रवीण धारावत यांच्या समवेत संपर्क साधण्यात यशस्वी झाले. मनोहर देसाई आणि दिनेश विचारे कुसुमभारतीमधील मोतीलाल मामांच्या घरी आले. त्यांनी प्रयत्न केले आणि मग डॉ. प्रवीण धारावत यांनी ’डेथ सर्टिफिकेट’ नितीनच्या हाती सुपूर्द केले. विकी राणे आणि त्यांच्या सहकार्यांना मनोहर देसाई यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रुग्णवाहिका आली आणि मोतीलाल मामांची परलोकीची यात्रा सुरु झाली. हे सर्व तर झाले. हे एक वानगीदाखल उदाहरण आहे पण दिवसागणिक असे कितीतरी प्रसंग घडत असतील, त्याची मोजदाद कोण आणि कशी करणार ? हाच सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा मुद्दा आहे, प्रश्न आहे. ही खरोखरीच मोठी समस्या होऊन बसली आहे. सगळ्या नियम नियमावल्या झाल्या. पण माणसाला त्याची अंतिम यात्रा सुद्धा जर सहज सोप्या पद्धतीने मिळू शकत नसेल तर काय उपयोग ? इहलोक आणि परलोक यांचा दुवा म्हणजे जसलोक. पण तो तरी सर्वांच्या नशीबी नाही. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार माणसाला होऊच नये, कोरोना व्यतिरिक्त अन्य मार्गाने माणसाला मृत्यूही येऊ नये, असे कसे बरे शक्य आहे ? आज वैद्यकीय अधिकारी सर्वसाधारण रुग्णाला हात लावायला तयार नाही, आज वैद्यकीय अधिकारी सर्वसामान्य माणसाला जर मृत्यू आला तर त्याचा मृत्यूचा दाखला (डेथ सर्टिफिकेट) मिळविण्यासाठी परिवारजनांना किती खस्ता खाव्या लागतात. मनोहर देसाई यांनी असा दाखला मिळण्यासाठी काय काय खटाटोप करावा लागतो, याचा दाखला देतांना सांगितले की, अशाच एका वैद्यकीय अधिकार्याने चक्क पंचवीस हजार रुपये मागितले तेंव्हा त्याला चौदावे रत्न दाखविताच पाचशे रुपयात असे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सांगितले. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असतांना एक किस्सा घडला होता. एका गावात सामान्य माणसाला वीज मिळणे कठीण झाले होते. वीज मंडळ अधिकारी आणि गावकर्यांत वाद होता. त्यामुळे जाणून बुजून वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ही बाब जिल्हाधिकार्यांपर्यंत गेली. त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना बोलावले. जिल्हाधिकारी आणि जिल्हाप्रमुख यांच्या मध्ये ठरले. त्या वीज मंडळ अधिकार्यांना धडा शिकवायचा होता. पोलीस ठाण्यात आधीच ’तयारी’ झाली होती. जिल्हाप्रमुख गेले आणि त्या अधिकार्याच्या कानाखाली काढली. त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि गावात वीज चमकली. पोलिस ठाण्यात तक्रार गेली पण ती तक्रार दुर्लक्षित करण्यात आली होती, गावकर्यांना सुविधा मिळण्यासाठी हा खटाटोप झाला. अर्थात, हा मार्ग सनदशीर नव्हे परंतु काहीवेळा हेही करावे लागते. महेश वामन मांजरेकर यांच्या ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात सुद्धा सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन मिळते. परंतु कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणूस काय असाच अंधारात चाचपडत बसणार ? ’कुणी डेथ सर्टिफिकेट देतो का डेथ सर्टिफिकेट ?’ असा प्रश्न कुठपर्यंत विचारत बसणार ? अशा प्रसंगात माणसाला दिलासा कोण देणार ? या कालखंडात अनेक घटना अशा घडल्या आहेत की त्या प्रत्येक घटनेची स्वतंत्र कादंबरी होऊ शकेल. मनाला वेदना देणार्या असंख्य घटना घडल्या आहेत. एक बाब समोर आणली की हजारो गोष्टी बाहेर येतात. टाळूवरचे लोणी खाणार्या अवलादी कधी नेस्तनाबूत होतील आणि सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास केंव्हा घेणार हे तो परमेश्वरच जाणे. -योगेश वसंत त्रिवेदी
Similar Posts
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून महाडेश्वर ? – लटकेंचा राजीनामा लटकला
मुंबई/ शिवसेनेने अंधेरी पूर्व विधासभा पोट निवडणुकीसाठी भलेही दिवंगत रमेश लटके यांचा पत्नीला उमेदवारी दिलेली असली तरी त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण त्या पालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना जी अट घातली होती तीच अट त्यांच्या उमेदवारीच्या मुळावर आली असून पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज दाखल करू…
वानखेडे यांची बदली की निलंबन?
मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय…
शिवशाहीचे वारसदार
शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि…
महाराष्ट्रतील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम..
भिवंडी दि 11(प्रतिनिधी ) स्व:कमाईतून सामाजिक बांधीलकी जपणारी भारतातील एकमेव अग्रगण्य शैक्षणिक व सामाजिक संस्था जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून यंदाही आपल्या बाप्पाच्या आगमनाला कोरोना नावाचं संकट हे आहेच परंतु आपल्या बाप्पाचे स्वागत आपण खूप जल्लोषात करणार ह्याची खात्री आहे.. म्हणूनच गणेश भक्तांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था घेऊन येत आहे घरगुती गणपती…
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु
मुंबई: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवाब मलिक याना ३ मार्च पर्यंत ई डी कोठडी
मुंबई/ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेल्या आहे .कारण कुर्ल्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि 7 तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ई डी कोठडी दिली आहे. दरम्यान या कारवाईच्या…
