बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा – पालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळापालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यातमुंबई – मुंबैकरांच्या सोयीसाठी १४०० कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत . त्यावर आता पॅच मारून अब्रू झाकण्याचे काम पालिका अधिकारी करीत आहेत पण या सर्व प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करावी तसेच यात सामील असलेल्या अधिकार्यांना…
समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
“ यावेळी उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या…
सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियान आत्महत्या प्रकरण-आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई/सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयने व्यवस्थित तपास केलेल्या नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेमुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अशील संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी…
ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
ठाणे/ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे…
