बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
मेथा चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला थडकले
नवी दिल्ली/भारतावर नवं संकट आलं आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम या भागातील किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळाने धडक दिली आहे. १७ किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ मछलीपट्टनमपासून २० किमी, काकीनाडापासून ११० किमी आणि विशाखापट्टणमपासून २२० किमी अंतरावर आहे. सध्या किनाऱ्यावर ९० ते १००किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे…
ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के
गोहाटी/काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या…
पवार काका – पुतण्यांना मोठा धक्का – राष्ट्रवादीच्या फायरब्रॅन्ड नेत्या काँग्रेस मध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश…
अजित पवार गटाचे शरद पवारांवर गंभीर आरोप – राष्ट्रवादीच्या दोन गटातील सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली-शरद पवार हे घर चालवत असल्याप्रमाणे पक्ष चालवायचे पक्षात नियम पळाले जात नव्हते असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगातली सुनावणी १९ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. सुरुवातीलाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद…
युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु
मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४…
नवी मुंबईत साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण तीन लाख ६० हजार १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले.शासनाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ जानेवारीपासून सुरू करण्यात…
