बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
किश्तवाड ढगफुटी दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५ अजून १०० बेपत्ता ३८ गंभीर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.माचैल…
एस टी कामगारांचा संप चिघळणार; सरकारचा प्रस्ताव अमान्य
मुंबई/ न्यायालयाच्या आदेश नुसार सरकारने जो जी आर तयार केला आहे तो एस टी कामगारांना मान्य नसल्याने एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या ऑर्डर नंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल न्यायालयीन सुनावणी नंतर एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी तात्काळ समिती नेमावी आणि तिची बैठक घेऊन एस टी…
केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, 131 जण :मुंबई : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांचं प्राविण्य आणि सेवेसंदर्भात पद्म पुरस्कार जाहीर…
पुनर्विकासासाठी पालिकेकडे पैसा नाही-अतिक्रमित आरक्षित भूखंडावर पालिका पाणी सोडणार
मुंबई/ पालिका अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील सेटिंग मुळे मुंबईच्या अनेक आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होऊन तेथे झोपड्या आणि व्यावसायिक गाळे बेकायदेशीरपणे उभे राहिले आहेत. आता हे अतिक्रमित भूखंड ताब्यात घ्यायचे झाल्यास त्यावरील झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल पण त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. शिवाय हे मोकळे करून घेण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन अडथळे सुधा येण्याची शक्यता आहे ….
नव्या अधिसूचनेनुसार मुंबईतील एस सी, एस टी चे १७ प्रभाग राखीव होणार – ठाकरे गटाला सर्वाधिक फटका
मुंबई/ येत्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसाठी अधिक कठीण बनली आहे.मात्र महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दोन मिळून १७ प्रभाग राखीव होणार असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या दोन्ही ग्रान बसणार आहे.मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप…
मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले – बी डी डी चाळीतील ५५६ रहिवाशांना घराच्या चाव्या वाटप
मुंबई/ मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र…
