बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
निवडणूक स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई / राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्याचे निवडणूक आयोग सक्रिय झाल्याचं दिसतंय. निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, त्यासाठी जिथं जास्त आरक्षण कोटा असेल तिथं पुन्हा सोडत करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टातली पुढली सुनावणी २१जानेवारीला होणार आहे….
गांधी आणि मनुवादी!
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न
मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक…
पालिकेकडून खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
मुंबई /रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, याचे पालन करावे,…
झेड पी आणि पंचायत समिती निवडणुकीतही बिनविरोधचा पॅटर्न कायम
मुंबई/महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल ११ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, भाजपचे १० आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून ५उमेदवार बिनविरोध असून ६ उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत….
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
