बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
कॅप्टन ने संघ बदलला पंजाबचे माजी मुख्यमंत्री भाजपा मध्ये जाणार?
चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहेकॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी…
विवेक अग्निहोत्री यांनी ‘द दिल्ली फाइल्स’चे शीर्षक बदलले, ‘हिंदूंच्या नरसंहाराची’ कहाणी आता नवीन नावाने प्रदर्शित होणार
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर, विवेक अग्निहोत्री या त्रयीतील त्यांचा तिसरा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ घेऊन येत आहेत. पण एका मनोरंजक घटनेत, त्यांनी चित्रपटाचे नाव प्रदर्शित होण्यापूर्वीच बदलले आहे. हा चित्रपट आता ‘द बंगाल फाइल्स’ म्हणून प्रदर्शित होईल.द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त चित्रपट आणि ‘हेट स्टोरी’ सारखे बोल्ड चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या चर्चेत…
हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का?
मुंबई/ करोनाचे संकट आहे हे जरी खरे असेल तरी आता करेनाचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होत आहे असे असताना सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध लावले आणि आता दहीहंडी उत्सव सुद्धा रद्द करायला लावलाय हा एक प्रकारे अन्याय असून हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ? असा थेट सवाल माझी महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवाणजी यांनी केलायशिवसेना आता हिंदुत्व…
मुंबईत फेरीवाल्यांची ‘झाडाझडती’ कारवाईला सुरुवात!महापौर रितू तावडेंच्या निर्देशानुसार ओळखपत्रे, कागदपत्रांची कडक तपासणी
मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा करून नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्य कागदपत्रांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या काही दिवसांत खरी कारवाई होईल की प्रशासन केवळ नौटंकी करेल, हे सध्या प्रतीक्षेचे आहे.वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या तक्रारींमुळे महापौर रितू तावडे…
वरळीत १६९ अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
मुंबई/किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आणि वरळी येथील खान अब्दुल खान गफार मार्ग स्थित असलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने हातोडा चालविला. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने निष्कासनाची कारवाई केली.अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात…
हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा- अमित शहांना उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई/ महाराष्ट्रावर आदिलशहा निजामशहा असे कितीतरी शहा येऊन गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कुठल्याही शहाणा घाबरत नाही हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा असे अमित शहा यांना जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.काल गोरेगाव येथे शिवसेना गट प्रमुखांच्या बैठकीत बोलताना शिंदे गटाचा उल्लेख मींधे गट असा केला तसेच भाजप आणि शिंदे…
