बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने आदी ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ठेऊन हे सगळ चालू ठेवण्याचा निर्णय ठीक आहे कारण कोरोणाची भीती असली तरी पोटापाण्याचा सुधा प्रश्न आहेच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण गर्दीची आणखीही ठिकाणे आहेत यामध्ये लोकल ट्रेन,राजकीय पक्षांची आंदोलने यात्रा,महाराष्ट्राच्या ठीक ठिकाणच्या एस टी डेपो मध्ये सुरू असलेली आंदोलने नेत्यांच्या पोरा बाळांचे शाही विवाह सोहळे मार्केट,आणि मास्क चां नियमाला न जुमानता बेधडक रेल्वे स्टँड बस स्टँड येथे फिरणारे रिक्षा आणि टॅक्सी वाले यांचे काय करणार ? आपल्याकडे फक्त नियम केले जातात पण त्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी मात्र केली जात नाही.आणि जे नियम करतात तेच नियम तोडतात महाराष्ट्रात मास्क बाबतचा नियम दोनच नेते काटेकोरपणे पाळतात एक उप मुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे स्वतः मुख्यमंत्री उधव ठाकरे त्यामुळे कोरोना त्यांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. सध्या महाराष्ट्राचे जे १० मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत त्यांनी जर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले असते तर त्यांना कोरोना झालाच नसता.तेंव्हा अगोदर राजकीय नेत्यांनी नियम पाळावेत आणि नंतर इतरांना सांगावे.कारण कोरोना चे हे संकट कुठल्या एका वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि कोरोनचि निर्मिती सुधा मानवाने च केलेली आहे म्हणूनच आता कोरोना मानव जातीचाच घास घ्यायला निघाला आहे.तेंव्हा आता तरी सरकारच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी तरच तिसरी लाट थोपावण्यात यश येईल आणि कोरोनांचे नियम काटेकोरपणे पळण्याबाबतची सुरुवात पुढाऱ्यांनी आपल्यापासून करावी.अशा परिस्थितीत लोकांमध्ये मिसळायलाच हवे असा काही नियम नाही मंत्री आणि आमदार सुधा वर्क फ्रॉम होम करू शकतात तातडीच्या कामासाठी व्हिडिओ कन्फर्सिंग द्वारे प्रशासनातील अधिकारी वर्गाला आदेश देऊ शकतात कारण शेवटी राज्याचा गाडा हाकण्याचे काम प्रशासन करीत असते मंत्री संत्री फक्त राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विकासाबाबत धोरण ठरवत असतात त्या धोरणाची अमल बजावणी प्रशासन करीत असते .त्यामुळे मंत्र्या संत्र्यानी घरातच बसून राहावे.बाहेर फिरण्याची आणि लोकांच्या गर्दीत मिसळण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याचा कारभार चालण्यासाठी मंत्री आणि लोक प्रतिनिधींनी घराबाहेर पडायला पाहिजे असा काही नियम नाही.
Similar Posts
हिंदू राहिला नाही तर हे जगचं राहणार नाही / मोहन भागवत
इंफाळ/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या…
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार सहकुटुंब
मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी…
पालिकेची हातसफाई आणि १८४४ कोटींच्या घोटाळ्यांची वसाहात
मुंबई/सत्ताधारी शिवसेना ,पालिका अधिकारी,आणि कंत्राटदार या त्रिकुटाने मिळून पालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे की काय असा संतप्त सवाल मुंबईकर जनता विचारीत आहे कारण पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत तर कोट्यवधींचा घोटाळा झालेलाच आहे पण आता सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामात सुधा १८४४कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने केला…
भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकले- उद्धव ठाकरेंचा जबरदस्त हल्लाबोल
पुणे – भाजपची भूमिका युज अँड थ्रोची असून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुंबाचा वापर करून फेकून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कसबा चिंचवडच्या ऑन लाईन प्रचारात भाजपवर हल्लाबोल केलाकसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची…
मुंबई महाालिकेला लोकायुक्तनी दिली क्लिनचीट
मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या…
