मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
निवडणूकीचे बिगुल वाजले – महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल
मुंबई/ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले.आज निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला..निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी, निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना,23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील २९ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख,30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी.४ नोव्हेंबर अर्ज…
‘बाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा ‘जल्लोष लोककलेचा’ उत्सव आयोजित करणार’ – ऍड. नीलम शिर्के-सामंत.
अशा महोत्सवातून मुलांमधे लोककला संस्कृतीचीआवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतेय .असा विश्वास व्यक्त करत , या जल्लोष लोककलेचा मिळणारा मोठा प्रतिसाद पहाता बालरंगभूमी परिषद दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करणार अशी घोषणा एड नीलमताई शिर्के सामंत, बालरंग भूमी अध्यक्षा. यांनी त्त्यांच्या भाषणात बोलून दाखविला.बालरंग भूमी परिषद, बृहन्मुंबई शाखा आयोजित ” जल्लोष लोककलेचा २०२४”…
छत्तीसगड मधील चकमकी २७ नक्षलवादी ठार
नारायणपूर/भारताच्या लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नक्षलवाद विरोधी मोहिमही तेज करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या अबूजमाड मधील जंगलात पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले .यात १ कोटींचे इनाम असलेला नक्षल कमांडर बसवराज राजूचा समावेश आहे.या चकमकीत एक जवान शहीद झाला.गडचिरोली…
अंधेरी पोट निवडणुकितील संघर्षाला सुरुवात- शिंदे गटाला ढाल तलवार
मुंबई/शिंदे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अंधेरी पोट निवडणुकीतील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही गटांना निवडणूक पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हे मिळाली आहेत शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिले आहे .त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार यांच्यातील सामना रंगणार…
महापालिका निवडणुकीनंतर वापरून ते मनसेला फेकून देतील! रामदास कदमांचा दावा
मुंबई : राज आणि उद्धव भलेही एकत्र आले तरी त्यात राजच्या मनसेचे नुकसान आहे.त्यातच मी उद्धवला जवळून ओळखतो तो राजचा घातपात करण्याचीही शक्यता आहे असा अजब दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.महाराष्ट्रात शिवसेना-मनसे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा केला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते…
बेटिंग ऍप प्रकरणी अनेक बेड सेलिब्रिटी ईडीच्या जाळ्यात
नवी दिल्ली/ऑनलाइन बेटिंग ॲप १xबेट च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे, काही सेलिब्रिटींनी १x betॲपद्वारे मिळवलेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. हे गुन्ह्यांचे उत्पन्न मानले गेले आहे.सेलिब्रिटींच्या या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडी लवकरच…
