मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
मुंबइ, शनिवार : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी दि. 6 जानेवारी रोजी देण्यात येणारे विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले.सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :पुरस्कारांचा तपशील आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. देवेंद्र कोल्हटकर…
दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस ठाण्यातच भीषण स्फोट! ७ पोलिसांसह ९ ठार ३० जखमी
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. यामध्ये ७ पोलिसांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी…
वार्ड आरक्षणाचा अनेक नगरसेवकांना फटकापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई/ अखेर मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा,तेजस्विनी घोसाळकर,माजी महापौर मिलिंद वैद्य ,कप्तान मलिक आदींचे वार्ड आरक्षित झाल्याने त्यांना नवे वार्ड शोधावे लागतील.न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी…
ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक अधिवेशनात सर्वानुमते मंजूर-निवडणूका लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेतओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात – मुलगी रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच
जळगाव – एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.भा जपकडून…
५ ते ६ फेब्रुवारी मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा 30 तास बंद राहणार
मुंबई/पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जल बोगदा दरम्यान मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन 2400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे 1800 मिलिटरी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन 2400 मिलिमीटर वासाची जलवाहिनी कार्य करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान तीस तास…
