मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
मुंबई महापालिकेत 1600 कोटींचा जाहिरात घोटाळा
मुंबई/ सोन्याची कोंबडी अशी ओळख असलेली मुंबई महापालिका म्हणजे सत्ताधारी,कंत्राटदार आणि पालिका प्रशासन या तिघां साठी भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण आहे आणि याच कुरणावर चारून काहीजण इतके मजले आहेत की ते आता कायद्याला सुधा जुमानयला तयार नाहीत असे आम्ही नाही तर संपूर्ण मुंबईकर जनता म्हणतेय आणि आता तर पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी एक…
मागास अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करा
मुंबई, दि.२८ ऑक्टोबर २०२१: नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो ( एनसीबी)चे संचालक समीर वानखेडे यांच्या जात- धर्माचे गौडबंगाल आणि जात पडताळणीच्या एका ‘करोडपती’ उपायुक्ताला दोन लाखांची लाच घेताना अलीकडेच झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’मार्फत सेवेत आलेल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करण्यात यावी, त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आयएएस,आयपीएस अधिकारी आणि मागास समाजातील नामवंतांचा समावेश असलेली उच्च स्तरीय समिती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा…
भारतावर २५ टक्के कर लादल्याने भारत अमेरिका संबंध बिघडणार
नावी दिल्ली/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर २५ टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताला याचा आर्थिक फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं आहे. आता अमेरिकेने कर लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर…
बांगलादेश प्रमुख बंदरे चीनला भाड्याने देणार! भारताचे टेन्शन वाढले
ढाका/चटगांव पोर्ट हे बांग्लादेशातील सर्वात मोठं आणि महत्वाचं बंदर आहे. बांग्लादेश सरकार लवकरच या बंदराच्या तीन प्रमुख टर्मिनल्सचा संचालन परदेशी कंपनीकडे देणार आहे. बांग्लादेशातील निवडणुकीआधी मोठी बंदरं चीनला देण्याची तयारी देशात सुरु आहे. ही बंदर देशातील ९२ टक्के आयात आणि निर्यातीचा व्यापार संभाळतात. या निर्णयावर राजकीय पक्ष आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी चिंता व्यक्त केलीय तसच…
महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
