मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना विषयक आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडून आदेश काढण्यात आले (नाव, पदनाम, सध्याचे खाते / कार्यालय, ते बदली / पदस्थापना झालेले खाते / कार्यालय) याक्रमाने – अ) सहआयुक्त / उपायुक्त संवर्गातील बदली विषयक…
गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी
शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात…
OC नसताना घाटकोपर SRA फ्लॅटचा ताबा; बिल्डरवर गुन्हा
घाटकोपर पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भोगवटा प्रमाणपत्र (OC) नसताना 18 ते 25 व्या मजल्यावरील सदनिकांचा ताबा रहिवाशांना दिल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी M/s Neelam Finance (Bombay) Pvt Ltd या बिल्डर कंपनीवर आणि तिचे संचालक चंपकलाल के. वर्धन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. SRA अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर MRTP कायद्याच्या कलम 53(7) अंतर्गत ही कारवाई झाली.SRA, एन-वार्ड, घाटकोपरचे…
पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग चार जणांचा होरपळून मृत्यू नऊ जण जखमी
पुणे/पुण्याच्या हिंजवडी भागातील फेज वन मध्ये एकाच टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून त्यातील चार कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहे हे सर्व कर्मचारी आयटी हब मधील व्योमा ग्राफिक या कंपनीचे होतेआज सकाळी आठ वाजता पुण्याच्या हिंजवडी भागातील पेज वन मध्ये व्योमा ग्राफिक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा एक टेम्पो ट्रॅव्हल…
कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना
मुंबई/कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून बोरिवलीच्या अर्थाव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ईशान्य कडील 3 राज्यांना 3 रुग्णवाहिका देण्यात राज्यपाल रमेश बैस.यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या तीन राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना ऍम्बुलन्सच्या प्रातिनिधिक किल्ल्या देण्यात…
