मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमोबाईल मधले किलर गेम
मोबाईल ही सध्या माणसासाठी जीवनावश्यक वस्तू बनली आहे.मात्र या मोबाईलचा जर चांगल्या कामासाठी वापर केला तर माणसाला आर्थिक लाभ आणि सार्वजनिक क्षेत्रात एक नवी ओळख मिळू शकते पण त्याचा दुरुपयोग केला तर मात्र माणसाचे आयुष्य बरबाद होऊ शकते त्यामुळे मोबाईल मधील वाईट गोष्टींपासून माणसाने नेहमीच दूर राहायला हवे खास करून मोबाईल मध्ये माहितीच्या मायाजलाच्या अंतर्गत…
समाजसेवक आश्विन नाईक यांना वाढदिवसा निमित्त जनतेकडून हार्दिक शुभेच्छा!
मुंबई/डीलायरोड भागातील सामाजिक समाजसेवक अश्विन नाईक यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अश्विन नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याकडून डीलायरोड भागातील जनतेची भविष्यात चांगल्या प्रकारे सेवा घडो अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त केल्या.
न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर धडा असलेल्या आठवतील पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी सर्व पार्टी जप्तीचे आदेश
नवी दिल्ली /न्याययंत्रणेतील भ्रष्टाचाराबद्दल धडा असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने प्रकाशित केलेल्या इयत्ता आठवीच्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संपूर्ण बंदी घातली. तसेच या पुस्तकाच्या छापील व डिजिटल प्रती जप्त करण्याचे आदेशही दिले.न्याययंत्रणेची बदनामी करण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे. असा गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याययंत्रणेला रक्तबंबाळ केले आहे असे…
केंद्राकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे अमित शहांचे आश्वासन
नाशिक/ अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार तातडीने मदत देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिलेगेल्या महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री…
‘टोल’धाडी साठी भारतीयांनी मोजले 2.40 लाख कोटी !
देशभर सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या “”टोलधाडी” च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल 2.40 लाख कोटी रुपये मोजले आहेत. या “टोल धाडी ” च्या कमाईची सुरस कथा. गेल्या पंचवीस तीस वर्षात विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली. त्यांच्या उभारणीची, देखभालीची सर्व…
मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी पक्षातील नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव
मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.युतीची चर्चा जरी…
