मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
Similar Posts
सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असे नामांतर’
।मुंबई – दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेल्या रवींद्र जाधव कोतापकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’ असे नामांतर…
इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलचा शुभारंभ – गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार
नवी दिल्ली – देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा…
सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की माझ्या मुलाचे तिकीट अनिल परब यांनी कापलेे. सेनेच्या विरोधकांना घेऊन ते मातोश्रीवर जातात त्यांनी सेनेचे मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहेे. ते…
देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त
मुंबई -मुंबई पोलीस दलात विशेष पोळी आयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले असून पोलीस दलातील जेष्ठ आयपीएस अधिकारी देवें भरती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी ‘मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त’ ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली…
बंगळुरू चेंगराचींगरी ! पोलीस आयुक्तांसह ६ पोलिस निलंबित – आरसीबीच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक
मुंबई : बंगळुरू चेंगराचेंगरीसंबंधी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरू शहराच्या पोलिस आयुक्तांना त्यांनी निलंबित केलं आहे. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकालाही निलंबित केलं आहे. त्याचसोबत आरसीबी संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८…
जेष्ठ क्रीडा समीक्षक लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
मुंबई- क्रिकेटचा सामना आपल्या लेखाने जिवंत करणारे, आपल्या नजाकतभर्या शैलीने वाचकांना प्रवासवर्णनातून जगभ्रमंती घडवून आणणारे, आपल्या मिश्किल शैलीत सिनेमा आणि सिनेकलाकारांचे चकचकीत विश्व उभे करणारे आलराऊंडर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, प्रसिद्ध सिनेनिवेदक द्वारकानाथ संझगिरी यांची कर्करोगाविरुद्ध सुरु असलेली झुंज अखेर अपेशी ठरली. आज सकाळी त्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात…
