६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर संपूर्ण समाजाला धडे दिले पाहिजेत श्रीपती शेषाद्री नावाच्या मुलाला योग्य मार्ग दाखवला मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढायला हवं असं त्यांना वाटू लागले त्या जाणवतेन आपले सहयोगी गोविंद कुमठे आणि भाऊ महाजनच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढलं. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठीत ठेवण्यात आली. तरी ब्रिटिश सरकारपर्यन्त आपला आवाज जावा या हेतूने वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा वृत्तपत्राची किंमत एक रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारं हे वृत्तपत्र या अंकात दोन स्तंभ असायचे उभ्या मजकुरात एक स्तंभ कॉलम मराठीत तर एक स्तंभ इंग्रजीत असे मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहलं हे राज्यकर्त्यांना कळावं यासाठी इंग्रजी मजकूर होता वृत्तपत्राची संकल्पना त्यावेळी लोकांना नवी होती. त्यामुळे दर्पणची वर्गनी सुरवातीच्या काळात कमी होती. पण हळू हळू ही संकल्पना रुजली त्यातील विचारही रुजले प्रतिसाद वाढला दर्पणवर प्रथमपासूनच बाळ शास्त्री जांभेकरांच्या व्यक्ती महत्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्ष चालले दर्पणचा शेवटचा अंक जुलै १८४० हा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तासोबत मराठीतील पाहिल मासिक दिग्दर्शन त्यांनी जुलै १८४० साली सुरू केले. दिग्दर्शन मधून भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन, नकाशे आकृतीच्या साह्याने प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर पाहिलं दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढलं दर्पण या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेचा मजकूर असायचा तो लोकांना आवडू लागला. त्याच बरोबर सार्वजनिक ग्रंथालयाच महत्व ओळखून बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. हिंदुस्थानी भाषेचे ते अध्यापन करत त्यांच्या प्रकाशित साहित्य कृतीमध्ये लेखी कथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप हिंदुस्थानाचा इतिहास शून्यलय गणित या ग्रंथांचा समावेश आहे. दर्पण हे बाळ शास्त्री यांनी त्यांच्या हातातील एक लोकशीक्षणाच माध्यम होतं. त्याचबरोबर पुनर्विवाहाच्या चळवळी झाल्या ज्ञान, बौद्धिक, विकास ह्या गोष्टी अनेक त्यांना महत्वाच्या वाटू लागल्या त्यामुळे त्यांच विचारमंथन होवून त्याच रूपांतर पुढं विधवा, पुनर्विवाहांच्या चळवळीत झाला. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणं हे त्यांचं स्वप्न होते. थोडक्यात आज सारख्या ज्ञाननिष्ठ समाज त्यांना २०० वर्षां पूर्वीचा अपेक्षित होता. असे हे बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम असा हा ६ जानेवारी २०२१ पत्रकार दिन.|पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा|
Similar Posts
सोमवारपासून सलग ३ दिवस आमदार अपात्रता सुनावणी सुरु
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल…
गुंडा ही सपाची परंपरा योगींचा अखिलेश वर आरोप
गोरखपूर- पूर्व उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासात आज(दि.४) एक अतिशय महत्त्वाचा दिवस होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण) क्षेत्रात २२५१ कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. गुंतवणूक प्रकल्पांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी कोका कोलाच्या बॉटलिंग प्लांटचा भूमिपूजन समारंभ आणि देशातील आघाडीची प्लास्टिक उत्पादन-पॅकेजिंग कंपनी टेक्नोप्लास्टच्या युनिटचे उद्घाटन यांचा समावेश आहे. यानिमित्त…
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने…
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा असलेली शक्ती विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद असलेले शक्तीविधेयक आज राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करून घेतले त्यावर आता राज्यपालांची सही झाली की त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या नव्या कायद्या नुसार महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा ३० दिवसात तपास करणे पोलिसांना बंधनकारक आहे. तसेच महिलांवरील असिड हल्ल्याच्या प्रकरणात जन्मठेप किंवा १५वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे…
बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम
बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची महिन्याभरात बदली करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून या प्रकरणी त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
