भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई/ अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली. त्यानुसार १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहेरविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह वरून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार असे जाहीर…
अटक टाळण्यासाठी नितेश राणे सत्र न्यायालयात
मुंबई/ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्य्यावं असा आवाज काढणारी नितेश राणे एकीकडे सत्ताधारी आमदारांनी निलंबित करा अशी मागणी केली ते दुसरीकडे कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मास्टर माईंड नितेश राणे असल्याची जबानी जखमी परब यांनी दिल्याने शिवसेनेने नितेश राणे यांच्या विरोधात कांनकवली पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल…
दिशाला मृत्यू नंतरही बदनाम का करताय -आई वडिलांचा सवाल
मुंबई/ सुशांतसिंग राजपूत याची कथित सेक्रेटरी दिशा सलियान हिच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाल्यामुळे दिशाचे पालक प्रचड तनावा खाली असून आम्हाला शांतपणे जगुद्य अन्यथा जीवच बरे वाईट करू असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता दिशा सलीयान प्रकरणाला भावनात्मक कलाटणी मिळाली आहे.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सलियन हिनेही इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. मात्र त्या अगोदर…
नाशिकमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले – वंचित कडून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार
नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.राज्यातील बहुतेक लोकसभा…
गुरूकडून बालेकिल्ला खेचण्यासाठी शिष्य सज्ज – माहीम विधानसभेत सैनिकांमध्ये अटीतटीची लढाई
मुंबई, (प्रतिनिधी)- प्रेमात आणि युद्धात… सॉरी निवडणूकीच्या युद्धात सारेकाही माफ असते. एकेकाळी सदा सरवणकर यांचा शिष्य असलेले महेश सावंत आपल्या गुरुंविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम विधानसभेत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही आमदारकीचा टीळा लावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे माहीमचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी, राखण्यासाठी…
