भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट-२३८ नव्या एसी लोकल मुंबईत धावणार
दिल्ली – मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच २३८ नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या…
गुजरातचा जयजयकार करणाऱ्या शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
।मुंबई/गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया…
दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात अनेक मध्यम व छोट्या बँकांनी उत्तम नफा कमावलेला आहे. तसेच काही बँकांचे एकत्रीकरणही यशस्वी झालेले आहे. खाजगीकरण करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे जाहीर करून याबाबतचे आवश्यक पाऊल केंद्राने नुकतेच टाकलेले…
“मटण खा त्याचं पण बटण दाबा आमच- शिंदेंच्या मंत्र्यांचा मतदारांना सल्ला
जळगाव/राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिकमधील भगूर येथे आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. विरोधकांच मटण खा आणि बटण आमचं दाबा असं पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या भाषणातील…
