मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात असतानाच काही भूमाफिया नी काही लाचखोर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली . मात्र नागरिकांच्या तक्रारी येताच थातुर मतुर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर करोना काळात झालेली बांधकामे तशीच आहेत आणि हीच अनधिकृत बांधकामे तोडण्याचा विरोधीपक्ष नेत्यांनी आग्रह धरला आहे .पण ही अनधिकृत बांधकामे स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून करण्यात आलेली असल्याने आणि यात काही पालिका अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असल्याने मुख्यमंत्री संगीत की विरोधी पक्ष नेते संगीत कारवाई होणे कठीण आहे .
Similar Posts
बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
मंत्र्यांच्या बंगल्याना किल्ल्यांची नावे पण प्रत्यक्ष किल्ल्यावरच्या अतिक्रमणं आणि दुरवस्थेची काय?
मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या…
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि…
मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. शहरातील सदर…
दसरा मेळाव्या वरून शिवसेना-शिंदे गटात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ शिवसेनेच्या मलकिवरून सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे.दोघांमधील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच दसरा मेळाव्यावरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली आहे.त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिमग्यातील राडेबाजीची भीती व्यक्त केली जात आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील…
