भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे मालकाने एक महिन्याचे भाडे थकल्याने मालकाने थेट मनसेच्या कार्यालयाला टाळे मारल्याने मनसेचे भानुशाली यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असताना याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी आणि उपाध्यक्ष प्रविण देवकर यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन भानुशाली आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांसमोरच अपशब्द बोलून धमकावल्याने भयभीत झाल्या मुळे भानुशाली यांच्या पत्नीने शहर अध्यक्ष मनोज गुळवी, प्रविण देवकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे . या संदर्भात भिंवडी प्रतिनिधीने शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असताना संपर्क होऊ शकला नाही….
Similar Posts
जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी
मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी…
नायरच्या त्या डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ बी डी डी चाळ सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमींवर उपचार करण्यास नायर मधील ज्या डॉकटर आणि परीचारिकेने निष्काळजीपणा केला त्यांच्या विरोधात परभग २०७ च्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी अगरी पाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून या प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.वरळी येथील बी डी डी चाळीत १डिसेंबर रोजी सिलेंडरचा स्फोट…
नायारचा भूखंड खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न – पालिका अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार
मुंबई/ पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरला सर्वोच्च न्यायालयाने चपराक देत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे .मुंबई सेंट्रल येथील लाल चिमणी कम्पाऊड येथील नलिनी बेन यांचा ताबा असलेली गोदामांची जागा पालिकेने रबरवला डेव्हलपरला हस्तांतरीत केली होतो . ही जागा मूळची भारत स्विपिंग अण्ड विव्हींग मिलच्या मुळ मालकीची होती ….
पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेची मुदत वाढवली
दिल्ली/ लॉक डाऊन काळात सर्व बंद असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत गरिबांना मोफत गहू तांदूळ दिले जात होते.या योजनेची मुदत डिसेंबर पर्यंत होती पण ती आता मार्च२०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे या योजनेतील गरीब लाभार्थीना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आला असला…
पालिकेकडून खड्ड्यांचे राजकारण सुरू
मुंबई/सध्या पावसाळा सुरू आहे आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चालत झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पक्षीय राजकारण सुरू आहेच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत पण आता पालिकेनेही मुंबईच्या खड्ड्यांचे राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. प्रकल्प असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे सध्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत कारण…
रामनवमीच्या यज्ञाला इंदोरमध्ये गालबोट
मंदिराच्या विहिरीवरील छत कोसळून १५ भाविकांचा मृत्यूभोपाळ – आज सर्वत्र रामनवमीचा उत्साह सुरु असतानाच मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये एक भयंकर दुर्घटना घडली. मंदिरात रामनवमी निमित्त यद्न्य सुरु असतानाच मंदिरातील विहिरवरचे छत कोसळून अनेक भाविक विहिरीत पडले या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या…
