भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे मालकाने एक महिन्याचे भाडे थकल्याने मालकाने थेट मनसेच्या कार्यालयाला टाळे मारल्याने मनसेचे भानुशाली यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असताना याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी आणि उपाध्यक्ष प्रविण देवकर यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन भानुशाली आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांसमोरच अपशब्द बोलून धमकावल्याने भयभीत झाल्या मुळे भानुशाली यांच्या पत्नीने शहर अध्यक्ष मनोज गुळवी, प्रविण देवकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे . या संदर्भात भिंवडी प्रतिनिधीने शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असताना संपर्क होऊ शकला नाही….
Similar Posts
ठाकरे विरुद्ध ठाकरे राडेबाजी सुरू
तर महाराष्ट्रात या लोकांना सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारासंभाजी नगर/बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध आता मनसेही चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि शेन फेकले त्यामुळे आता ही राडेबाजी आणखी वाढत जाणार असल्याचे दिसत आहे हिंगोलीत…
वार्ड फेर रचनेच्या विरोधात भाजप नगरसेवक न्यायालयात
मुंबई/ राज्य सरकारने नुकतीच मुंबई महापालिका क्षेत्रातील वार्ड ची जी फेररचना करून वार्ड ची संख्या वाढवली आहे त्याच्या विरोधात अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर या दोन भाजप नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यावर गुरुवारी सुनावणी आहेे.काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वार्ड फेर रचना करून ९ वार्ड वाढवले.त्याला भाजपने विरोध केला आहे….
मला हलक्यात घेऊ नका तुम्हाला पुरून उरलोय – एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई/सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या. लाडकी बहीण योजना आली नसती. जेष्ठांना सवलतीच्या योजनांचा लाभ मिळाला नसता. बँकेमध्ये पैसे आले नसते .हे सरकार पंधरा दिवसात पडेल, एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल असे काही लोक म्हणत होते. पण हा एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरला. मी घासून पुसून नाही, तर ठासून दोन…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार
मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
