भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी करून टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता .त्यानुसार स्थानिकांचे रास्तारोको आंदोलन होताच दुसऱ्याच दिवशी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालोडी टोल नाका येथे धडक देत येथील टोल वसुली बंद करून रस्त्यावरील वाहनांना टोल न भारताचा जाऊ दिले .परंतु स्थानिकांच्या आंदोलच्या पार्श्वभूमीवर मनसेने वेगळे आंदोलन केल्याने हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे .यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
Similar Posts
आज मानापमान नाट्यात चिपीचे लोकार्पण; पद मोठे पण पत्रिकेवर नाव छोटे राणे नाराज
ठाकरे राणे एकाच व्यासपीठावरसावंतवाडी- आज कोकणातील बहुचर्चित चिपी लोकार्पण होत असून त्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये काही राडेबाजी होऊ नये म्हणून विमानतळ परिसरात प्रंचड फौजफाटा तैनात करण्यात आला आहेकोकणातील चिपी येथे २७४ हेक्टर जागेवर हा विमानतळ बांधण्यात आला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयतुझे माझे जमेना पण…
महाराष्ट्रासारख्या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल वाटत नाही.भाजपने किती जारी कांगावा केला किती जारी पोलखोल्यात्रा काढल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर जिंकणे त्यांना शक्य नाही म्हणून तर मनसेच्या इंजिनाच्या मागे धावायला लागले आहेत .पण त्याचा महाराष्ट्रात जरी भाजपला थोडाफार फायदा झाला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा राज ठाकरे यांना…
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
मी अपघाताने राजकारणात आलो – राज ठाकरे
मुंबई – सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा मला वीट आला आहे. माझी राजकारणात येण्याची इच्छा नव्हती पण मी अपघाताने राजकारणात आलो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली…
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,…
Covhidshild लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याचा सल्ला
नवी दिल्ली :कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला असून, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिला असून, आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते…
