मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.
आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी सावधगिरी बाळगा पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन आपल्याला कोरोनामुक्त वातावरणात करायचा आहे असा आशावाद व्यक्त केला
Similar Posts
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
यूपी चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन सोमवारी अंत्यसंस्कार
लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळी तोडफोड
सोलापूर/शनिवारी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या वेळी काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली यात एक किसान किरकोळ जखमी झाला तर याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्या मोर्चात स्फोटक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे समजतेसध्या देशभर आणि खास करून महाराष्ट्रात हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार विधाने केली जात आहेत…
काँग्रेसचा मनसेला विरोध महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर
मुंबई/मत चोरीच्या मुद्द्यावर भलेही महाविकास आघाडीने मनसे सोबत मोर्चा काढलेला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.कारण मनसेची परप्रांतीय विरोधी भूमिकेचा काँग्रेसला बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणूनच महाराष्ट्र काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.तर उद्धव ठाकरे मनसेबाबत आग्रही असल्याने ठाकरे बंधू…
एस टी चे खाजगीकरण होणार ?
मुंबई/ तोट्यात असलेले सार्वजनिक उपक्रम आणि त्यातील कामगारांचा त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेला अट्टाहास यामुळे सरकार वैतागले असून आता एस टी चे खाजगीकरण करण्याचा सरकार विचार करीत आहे .विलिनीकरण मागणीसाठी गेल्या दोन आठवडे पासून एस टी कामगारांचा संप सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत एस टी कामगार न्यायालयाचे सुधा एकात नसल्याने सरकारने आता एस टी…
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला
मुंबई – महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती आहे. महायुतीच्या ४८ पैकी ४६ निश्चित झालेत तर 2 जागांवरुन अजूनही तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. कारण ठाण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ…
