नवी दिल्ली/देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत. सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार सर्व नागरिकांना राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरम् सुरू असेपर्यंत सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक आहे. याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येतं. यावरून आता सत्ताधारी खासदारांनी निर्णयाचं समर्थन केलंय. विरोधकांनी मात्र यावरून सवाल उपस्थित केले आहेत.
तिरंगा फडकावतानाच्या कार्यक्रमांमध्ये
राष्ट्रपतींच्या औपचारिक आगमन-निर्गमनावेळी
राज्यपाल/लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात
नागरी सन्मान कार्यक्रमात
राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करताना (एअर आणि दूरदर्शनवर)
परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज आणताना
याशिवाय, सरकारने विशेष आदेश दिलेल्या इतर कार्यक्रमांमध्येही हे राष्ट्रगान वाजवलं जाणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे जर ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ दोन्ही वाजवले जाणार असतील, तर सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ वाजवलं जाईल. त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवलं जाईल. या दोन्ही प्रसंगी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक असेल. मात्र, एखाद्या माहितीपट किंवा न्यूज फिल्ममध्ये राष्ट्रगीताचा भाग म्हणून वाजवलं गेलं, तर उभे राहण्याची सक्ती नसेल.याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.
खरेतर, १८७५ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२७ या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहिमेचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

