मुंबई/जानेवारी रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपलािकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच १६जानेवारी रोजी लागेल. एकाच दिवशी २९ महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट तसेच शिवसेनेचा शिंदे गट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. ठाकरे गटाने यावेळी मनसेसोबत युती केली आहे. या युतीसोबत आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन ठाकरे यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, का मुंबईत राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच . काँग्रेसने दलित तसेच बहुजन मतदार पाठिशी असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी युती केली आहे. या युतीमुळे आता मुंबईतील राजकीय गणित बदलणार आहे.
प्रकाश आंबेडकर सर्वेसर्वा असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची अधिकृतपणे घोषणा झाली. मुंबईतील टिळक भवनात पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यावेळी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका निवडणूकित वंचित ला २२७ पैकी ६२ जागा मिळाल्या असून, त्या मुख्यतः दलित आणि मुस्लिम प्रभावाखालील प्रभागांमध्ये आहेत. या जागा काँग्रेससाठी सी-कॅटेगरी म्हणजे कमकुवत मानल्या जातात, जिथे विजयासाठी मोठी खर्च आणि मेहनत करावी लागेल. युतीची पार्श्वभूमी काँग्रेसने वंचित ला सुरुवातीला ४८ जागा ऑफर केल्या होत्या, पण चर्चेनंतर ६२ वर गेले. ही युती भाजपला रोखण्यासाठी झाली असून, दोन्ही पक्षांनी विचार साम्यावर भर दिला असून प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत मान्यता दिली.
याचा काँग्रेस मध्ये परिणाम पहावयास मिळणार आहे. काँग्रेसमधील लढाऊ उमेदवारांना या युतीमुळे जागा सोडाव्या लागतील, ज्यामुळे त्यांचे “खच्चीकरण” होण्याची बोलले जाते. वंचित च्या मतांनी काँग्रेसला फायदा होईल, पण कमकुवत जागांमुळे वंचित साठी विजय कठीण जाणार आहे . पैशाचा मोठा खर्च होणार आहे. वंचित साठी फायदा-तोटा हा की वंचित ला स्वतंत्र लढण्यापेक्षा युतीतून मुंबईत प्रथमच खाते उघडण्याची संधी मिळेल. मात्र विधानसभा निवडणुकीत वंचित ची कामगिरी कमकुवत होती (३.६% मते) . महापालिकेच्या जागा जिंकणे वंचित साठी मोठी जबाबदारी असणार आहे.

