ठाणे/ कोण राज ठाकरे,कोण अविनाश जाधव यांना भय्या लोगोंका राज चालता है असे म्हणत म्हणत मनसे नेत्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.मात्र या घटनेमुळे शिंदेंच्या ठाण्यात परप्रांतीय भाईंची काही दादागिरी चालते हेच दिसून आले.
शहरातील पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर काल रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहित समोर आल्यानंतर मनसेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. स्वत: मनसे नेते अविनाश जाधव यांनीच याबाबत माहिती दिली.
कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव सब मेरे लं… “ ”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” अशा शब्दात परप्रांतिय रिक्षाचालकाने मनसे नेत्यांबद्दल अश्लिल भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. ठाण्यातील गांधी नगरमध्ये परप्रातींय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला. प्राथमिक माहितीनुसार, गाडी लावण्यावरुन हा झाला वाद झाला. या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर परीसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अभ्रद्र शिविगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करु अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आल्याने मनसेही आक्रमक झाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता, मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे. जो कोणी राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

