मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल अशा शब्दांत आपापल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ आयोजित आदरांजली सभांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विजय वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरचिटणीस प्रवीण वराडकर, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार, कवी, साहित्यिक विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदिप टक्के यांनी विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाची इमारत बोरीवली ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पात जाणार आहे. या इमारतीतील ग्रंथालय/वाचनालयासाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या विषयाचा उहापोह सायंकाळी मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आला. तेंव्हा हे ग्रंथालय/वाचनालय वाचविणे, टिकविणे एवढेच नव्हे तर ते वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विजय वैद्य यांचे नांव बोरीवली कडील भूयारी मार्गाला देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विजय वैद्य यांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन प्रा. नयना रेगे, विभाग संघटक शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी आदरांजली वाहिली.
Similar Posts
अरेच्च्या ! लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी – १२ लबाड भावानी भरले अर्ज
छत्रपती संभाजी नगर – सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु झाले आहेत.छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड जिल्ह्यात चक्क १२ जणांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यावर महिलांचा फोटो लावला पण इतर कागदपत्र स्वतःच्या नावाची असल्याने ते पक्स्डले गेले . त्यामुळे या लबाड भावांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेमुख्यमंत्री माझी लाडकी…
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी…
बेस्ट कर्मचाऱ्याकडून २६ डीसेबरला काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई : बेस्टचा परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात असतो. मात्र हा तोटा कसा भरून काढायचा यावर सरकारने कधीच गांभीर्याने विचार केला नाही. मात्र हा तोटा असाच राहिला आणि सरकार किंवा पालिकेकडून मदत मिळाली नाही तर लाखो मुंबईकरांची सेवा करणरा हा परिवहन उपक्रम कायमचा बंद पडेल आणि या उपक्रमातील हजारो कर्मचारी देशोधडीला लागती. त्यामुळे पालिकेने या उपक्रमाला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रकल्पांची पळवा पळवी
महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक 1 चे औद्योगिक राज्य आहे पण महाराष्ट्राचे हेच वर्चस्व आणि वैभव काहींच्या डोळ्यात खुपते आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळविणाऱ्या लोकांचे दलाल महाराष्ट्राच्या सतेमधे बसलेले आहेत आणि तेच झरितले शुक्राचार्य बनून महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा अडवित आहेत . त्यामुळे अशा लोकांचे सतेचे मार्ग रोखणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे काम आहे जबाबदारी आहे…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
