मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल अशा शब्दांत आपापल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ आयोजित आदरांजली सभांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विजय वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरचिटणीस प्रवीण वराडकर, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार, कवी, साहित्यिक विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदिप टक्के यांनी विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाची इमारत बोरीवली ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पात जाणार आहे. या इमारतीतील ग्रंथालय/वाचनालयासाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या विषयाचा उहापोह सायंकाळी मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आला. तेंव्हा हे ग्रंथालय/वाचनालय वाचविणे, टिकविणे एवढेच नव्हे तर ते वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विजय वैद्य यांचे नांव बोरीवली कडील भूयारी मार्गाला देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विजय वैद्य यांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन प्रा. नयना रेगे, विभाग संघटक शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी आदरांजली वाहिली.
Similar Posts
एकनाथ शिंदे ची नाराजी कायम महायुतीत खाते वाटपावरून तीव्र मतभेद
मुंबई/राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बाप्पा यश मिळाले मात्र असे असतानाही मुख्यमंत्री ठरवण्याबाबत तब्बल एक आठवडा उलटून गेला तरी निर्णय झालेला नाही दिल्लीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांचे नाव घोषित केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भलेही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की झालेले असले तरी अजून…
सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर
ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
नोटाबंदीवरील न्यायालयीन निर्णयाचा बोध महत्वाचा !
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षे प्रलंबित असलेल्या नोटाबंदीवरील निर्णयावर न्यायालयीन पडदा पडला. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल ४ विरुद्ध १ अशा बहुमताने दिला. एका न्यायमूर्तींनी नोटाबंदीच्या विरुद्ध मत दिले. यानिमित्ताने नोटाबंदीची प्रक्रिया व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबाबतचा उहापोह. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून चलनातील ५०० आणि १००० …
छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या समर्थनात भव्य मोर्चा
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी,सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ आयोजन करण्यात आले. इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्च्याला पाठींबा दिला. शहरातील क्रांती चौकातून साडेअकरा वाजेच्या सुमारास या मोर्च्याला सुरवात झाली होती.पुढे जालना रोडवरून निराला बाजार मार्गे…
भाषा हे वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम – आशिष शेलार
मुंबई : ‘भाषा ही वादासाठी नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषांच्या आदान–प्रदानातून संस्कृतीचा विकास होत असतो. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे त्या दिशेने टाकलेले एक स्तुत्य आणि उत्तम पाऊल आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली. मुंबई मराठी…
