मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल अशा शब्दांत आपापल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ आयोजित आदरांजली सभांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विजय वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरचिटणीस प्रवीण वराडकर, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार, कवी, साहित्यिक विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदिप टक्के यांनी विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाची इमारत बोरीवली ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पात जाणार आहे. या इमारतीतील ग्रंथालय/वाचनालयासाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या विषयाचा उहापोह सायंकाळी मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आला. तेंव्हा हे ग्रंथालय/वाचनालय वाचविणे, टिकविणे एवढेच नव्हे तर ते वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विजय वैद्य यांचे नांव बोरीवली कडील भूयारी मार्गाला देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विजय वैद्य यांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन प्रा. नयना रेगे, विभाग संघटक शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी आदरांजली वाहिली.
Similar Posts
मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप
राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर,यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वानखेडे यांची बदली की निलंबन?
मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय…
ऑपरेशन सिंदूरच्या दसक्याने दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीर मधून पलायन
श्रीनगर/पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ पीओकेहून हलवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण सूत्रांतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना आता पीओकेला सुरक्षित आश्रयस्थान मानत नाहीत.एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर…
बच्चू कडूना २ वर्षांची शिक्षा
नाशिक -आमदार बच्चू कडू राज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून२०१७ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी…
युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु
मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४…
उपनगरचा राजा चा अनोखा उपक्रम ; बोरीवली रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी ; असंख्य हमाल आणि बूट पॉलिश कर्मींनी घेतला लाभ
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगरचा राजा या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आणि निवारा स्नेहसदन संस्थेच्या सहकार्याने बोरीवली रेल्वे स्थानकावर तीन क्रमांकाच्या फलाटावरील सभागृहात बूट पॉलिश करणारे आणि प्रवाशांच्या अंगावरील भार आपल्या खांद्यावर लीलया पेलणाऱ्या असंख्य हमाल…
