केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
