देशातील ३३४ पक्षांची मान्यता रद्द!निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली/केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील ३३४ नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (आर यू पी पी एस) निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई…
