,
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या भूमिकेवर ठाम
मुंबई/ मराठ्यांना जे काही दिलेले आहे ते आमच्या सरकारच्या काळातच दिलेले आहे आणि २०१४ पासून आम्ही देत आहोत.सर्वांना संतुष्ट करणे हाच आपला प्रयत्न असतोदों समाजाला एकमेकांशी झुंजवत ठेवणे हे आपल्याला मान्य नाही राजकारण गेलं चुलीत पण समाजात तेढ निर्माण होता नये अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे .त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. २०१४ पासून २०२५ पर्यंत मराठा समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय झाले ते आमच्या सरकारने केले आहेत. त्यापूर्वीही फार काही झाले नाहीत आणि आता आमचंच सरकार पुन्हा निर्णय घेत आहे. मी, एकनाथ शिंदे असे आम्हीच घेतलेले हे निर्णय आहेत. आरक्षण पहिल्यांदा मी दिलं, मग त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या काळात आम्ही दिलं. त्यानंतर आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबळ केलं की आपण दीड लाख उद्दोजक आपण तयार केले आहेत. नोकऱ्या मागणारे नाहीत तर नोकऱ्या देणारे मराठा तरूण आपण तयार करू शकलो आहोत. सारथीची निर्मिती केल्याने मोठ्या प्रमाणात एमपीएससी आणि यूपीएससी ध्ये मराठा तरूणाचा टक्का वाढला आहे. भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने जो आपण निर्वाह भत्ता सुरू केला त्यामुळे हॉस्टेल जरी मिळालं नाही तरू मुलांना बाहेर राहता येतं. राहण्याचे आपण पैसे देतो. फी सवलत, विदेशात शिक्षणाची सवलत आपण दिली आहे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टीवरील सर्व निर्णय आपल्या काळात झाले
दोन समाजांना झुंजवत ठेवणे आणि त्यांच्यात तेढ निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असेही फडणीसांनी यावेळी स्पष्
केले. “आज जे १० टक्के आरक्षण आपण दिलं ते टिकलं आहे. अशी परिस्थिती नाही की मराठा समाजाला आरक्षण नाहीये, आरक्षण आहेच. त्यात वेदवगळी मते आहेत. काहींचं मत आहे की आम्हाला ओबीसातून द्या, काहींचं मत आहे की वेगळ्या पद्धतीने द्या. शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. कुठलं राज्य असा विचार करेल की आपल्या राज्यातील एक मोठा घटक असंतुष्ट राहावा? त्याने काय फायदा आहे? सर्वांना संतुष्ट करणं असाच आपला विचार असतो. पण असं करत असताना एकाच्या संतुष्टीसाठी दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणाकरिता उभं करा. एकमेकांशी भाडत राहा, झुंजवत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला ते करायचे देखील नाही. राजकारण चुलीत गेलं पण अशाप्रकारे समाजा-समाजात तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात कुठेही बसत नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

