मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपमेदवार ना गो गाणार यांचा दारुण पराभव झाला त्यांना केवळ ८२११ तर विजयी उमेदवार माविआचे सुधाकर आडबोले याना १६७०० मते मिळाली सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपने छुपा पाठींबा दिलेले अपक्ष सत्यजित तांबे यांचा ४६ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माविआच्या शुभांगी पाटील यांना २४२४९२७ मते मिळाली औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी २००९२ मते घेऊन विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील याना १३४९७ मते मिळाली अमरावती मतदार संघात चुरशीची लढत झाली माविआच्या लिंगाडे याना ४३३८३ तर रंजीत पाटील याना ४१ ००५ मते मिळाली
Similar Posts
साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत
: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…
मुंबई महापालिकेच्या बोरीवली आर/मध्य सहाय्यक आयुक्त पदी प्रफुल दिनेश तांबे तर गोरेगाव पी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदावर अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक आयुक्त पदाचा भार कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दोन आणखी सहायक आयुक्तांची नियुक्ती विभागांत करण्यात आली आहे. यातील प्रफुल दिनेश तांबे यांची बोरीवली आर/मध्य प्रशासकीय विभाग आणि अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी…
नाट्य शुक्रवार हा पत्रकार संघाचा उपक्रम अविश्वसनीय – अरुण नलावडे‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेयांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
मुंबई मराठी पत्रकार संघात प्रत्येक महिन्याच्याचौथ्या शुक्रवारी नाटकाची तिसरी घंटा वाजणार० प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ० प्रेक्षकांना मोफत प्रवेश मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या ऐतिहासिक वास्तूत ‘नाट्य शुक्रवार’च्या निमित्ताने नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे, ही घटनाच ऐतिहासिक आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी जे काम राज्यातील विविध नाट्य संघटनांनी, नाट्य कलाकारांनी करायला हवे, ते काम मुंबई मराठी…
औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
चीनची सावकारी
सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका…
भटक्या श्वान नसबंदी कार्यक्रम: BMC चा २३ कोटींचा खर्च, पण संकट कायम!
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, २०२४ च्या सर्वेक्षणानुसार शहरात ९०,७५७ श्वान असूनही २०३० पर्यंत ही संख्या ४.४८ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयासह ९ संस्था सहभागी…
