मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे .त्यामुळे राज्यपालांच्या राजीनाम्याची अफवाच होती हे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयन राजे यांनी एक बैठक घेऊन राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली . आता 3 डिसेंबरला रायगडावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडी राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे .
Similar Posts
नबाब मलिक यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर आज अखेर ते क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडले. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांचं जंगी स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव…
जाती-पातीचे विष, शरद पवारांनी पसरवले
ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात सभा घेतली. राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज सुरु असलेला जातीयवाद याआधी कधीही महाराष्ट्रात पाहिला नव्हता. फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरु केलं. पण आज पक्ष…
मुंबईतील बनावट वारसा, रहिवास, उत्पन्न प्रमाणपत्रांवर महसूलमंत्र्यांची टाच
मुंबई, : पद, अधिकार तसेच कनिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करत मुंबईत बनावट दाखले वितरित केल्याचा प्रकार समोर आल्याने, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चार अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाद्वारे तपासणी करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी, मुंबई शहर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल सहायक नागनाथ लोलेवार…
महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली: नाना पटोले- टिळक भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन
मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२१:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. बापूच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने…
एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?
मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान…
पालिकेची हातसफाई आणि १८४४ कोटींच्या घोटाळ्यांची वसाहात
मुंबई/सत्ताधारी शिवसेना ,पालिका अधिकारी,आणि कंत्राटदार या त्रिकुटाने मिळून पालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे की काय असा संतप्त सवाल मुंबईकर जनता विचारीत आहे कारण पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत तर कोट्यवधींचा घोटाळा झालेलाच आहे पण आता सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामात सुधा १८४४कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने केला…
