मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या ठिकाणी आपले गाळे असतील तर दाखवून द्या मी स्वतः त्यांना टाळे लावते असेही त्यांनी सांगितले.सोमय्या यांनी यापूर्वी कोवि ड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते आणि आता नव्याने आरोप केले आहेत
Similar Posts
छत्तीसगड मध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद
विजापूर – छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. कुटुरू रोड येथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाची वाहने जाताना हा स्फोट झाला. या आयीडी स्फोटात ९ जवान शहीद झाले आहेत. ८ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परतत असताना हा स्फोट…
धक्कादायक! रक्ताच्या नात्याला काळीमा -भावा बरोबरच्या लैंगिक संबंधातून बहीण गर्भवती
मुंबई/ आजकालच्या मुलाना काय झालाय कुणास ठाऊक अश्लीलतेचा विकृत व्हायरस आता लहान मुलांमध्ये सुधा पसरत चालला आहे. कारण मुंबईच्या कुरार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक १६ वर्षाच्या मुलीने आपल्याच अल्पवयीन १३ वर्षाच्या भावाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत…
पुणे पूल कोसळला: इंद्रायणी पूल दुर्घटना – चार जणांचा मृत्यू; ३० हून अधिक जखमी,
पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल रविवारी कोसळला. पूल कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवर बांधलेला लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात काही लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,…
बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व तोपरी सहकार्य ; आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या…
