मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यामुळे 40/५० वर्षांच्या जुन्या भाडेकरूंना इमारतीचा मालक यापुढे घबरवू शकणार नाही कारण बाप दाखव नायतर श्राद्ध कर या म्हणी नुसार जर मालक इमारतीचा पुनर्विकास करायला तयार नसेल तर त्याला बाजूला सारून तिथले रहिवाशी आता इमारतीचा विकास करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चाळ मालकांचे धाबे दणाणले आहेत .
Similar Posts
भोईवाड्याच्या एसआरएतील रहिवाश्यांचा बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा
मुंबई – परळ- भोईवाडा येथील एसआरएच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आज आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सायन येथीलओमकार बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने रहिवाशी सामील झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.परळ- भोईवाडा येथील जेरबाई वाडिया मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत २२ मजल्याच्या ६ इमारती बांधण्यात…
यमुनेला आलेल्या महापुरामुळे अर्धी राजधानी दिल्ली पाण्यात
दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या…
पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट
४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने दिलेल्या ४०० ड्रोन द्वारे भारतातील ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक ड्रॉन तसेच ३ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. त्यामुळे आता पाकिस्तानने…
राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई – गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये…
एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. या दस्तऐवजानुसार, गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC…
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
