मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत
Similar Posts
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली.या महोत्सवात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार असून 21…
मुस्लिम अभिनेत्रीची महाकाल मंदिरात पूजा मुल्ला मौलवींचा थयथयाट
भोपाळ/बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतंच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली. यालेळी अभिनेत्रीने पवित्र भस्म आरतीमध्ये भाग घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी तिला शाल देऊन सन्मान केला. नवीन वर्षाच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी नुसरत मंदिरात पोहोचली होती. यावेळी मुस्लिम धर्म आणि धार्मिक सहिष्णुतेमुळे ती चर्चेचा विषय झाली होती. काहींनी हिंदू मंदिराला भेट देण्याच्या तिच्या…
महायुतीला मनसेचे इंजिन
सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे….
सौदीत मोठी बस दुर्घटना ४२ भारतीयांचा मृत्यू
रियाध/सौदी अरेबियात मोठी दुर्घटना झाली आहे. कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भारतीय उमरासाठी सौदीला गेले होते. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. प्राथमिक रिपोर्टनुसार हा अपघात आय एस टी वेळेनुसार जवळपास दीड च्या सुमारास मुफरिहात जवळ झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
