मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत
Similar Posts
एस टी कामगारांचा संप मागे
मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलीन करून घ्या तसेच त्यांचे थकीत वेतन आणि महागाई भत्ता बाबत तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी एन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता तो आज सरकार बरोबर झालेल्या चर्चे नंतर मागे घेण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .एस…
सदावरतेच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची जामिनावर सुटका !आक्रोश कायम
छत्रपती संभाजीनगर: मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी वाहनाची तोडफोड करणाऱ्या तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करत असल्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे. हाच राग काढण्यासाठी तरुणांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली या प्रकरणी तिघांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर…
युपी आणि गोव्यात निवडणूक लढवा आणि अनामत जप्त करून घ्या- भाजपने उडवली शिवसेनेची खिल्ली
मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही…
डरपोक भाईजान – बिष्णोई यांच्या धमकी नंतर शस्त्र परवान्यासाठी सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
मुंबई/ पंजाबी गायक मुसेवला याची हत्या घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशंनोई यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली . या धमकीमुळे भाईजान इतका घाबरला आहे की त्याने पोलिसांकडे शस्त्र परवान्याची मागणी केली आहे त्यासाठी त्याने काल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली .सिनेमात अनेक गुंडांना लोळवणारा भाईजान सलमान खान खाजगी…
छत्रपती शिवाजी महाराज मैदान कायमस्वरुपी विद्युत रोषणाईत उजळले -प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले लोकार्पण-
मुंबई- दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) सायंकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. या लोकार्पण समयी…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
