मुंबई/ पालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वित्तीय संचालक पदावर नियमानुसार राहता येत नाही असे असतानाही पालिका कर्मचारी एकाच वेळी दोनदोन नोकऱ्या करतात त्यांची पालिकेतील नोकरी केवळ हजेरी पाटावर असते वरिष्ठांना लाच देऊन फक्त पालिकेत हजेरी लावून घ्यायची आणि काम दुसरीकडे करून पालिकेला चुना लावायचा असे बरेच प्रकार पालिकेत सुरू आहेत . पण विष्णू घुमरे या पालिका कर्मचाऱ्याने तर पालिकेची नोकरी करीत असताना चक्क मुंबई बँकेची निवडणूक लढवून संचालक बनला इतकेच नाही तर वेगवेगळ्या कंपन्या दाखवून कंत्राटे मिळवली पण त्याचे हे झोल उघडकीस येताच पालिका आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे . त्याच्या सोबत त्याचे आणखी दोन साथीदार आहेत आता या लोकांनी पालिकेला फसवल्याबद्दल पालिका त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची शक्यता आहे . त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अटक झाली तर त्याचे मुंबई बँकेतील घोटाळे बाहेर येतील असे बोलले जातेय .
Similar Posts
गुजरात मध्ये बोट उलटून- १४ विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
वडोदरा -गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदऱ्यातील हर्णी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे. या घटनेत दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू आहे.२७ विद्यार्थ्यांची सहल हर्णी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात…
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट कमलखांवर कारवाईचे आदेश
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्टकमलखांवर कारवाईचे आदेशमुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक व प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. याचदरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टनंतर मुख्यमंत्री…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप – आयोगाने आरोप फेटाळले
नवी दिल्ली/ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मत चोरीचा आरोप केला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात ६८५० नवीन नवे घुसवण्यात आली तर कर्नाटकातील आळंद मतदार संघात ६०१८ नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप केला .त्यासाठी पुरावा म्हणून एका मतदारालाच पत्रकार परिषदेत हजर केले.त्यामुळे निवडणूक आयोगावरचा संशय वाढला…
बिहार निवडणुकीच्या प्रचारात बुलडोझर बाबाचा दबदबा
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या शेवटच्या दिवशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या रोड शोला तुफान गर्दी पाहायला मिळाली. एनडीए उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित या रोड शोमध्ये लोकांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला, ज्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.लोहिया चौकातून सुरू झालेला हा भव्य रोड शो मच्छली चौकापर्यंत चालला. मुख्यमंत्री योगींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा,…
बारावीचे 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीला परीक्षा 15 मे रोजी निकाल
मुंबई/सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर होत असून पुढील दोन दिवसात हॉल तिकीट मिळण्याची शक्यता आहेराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज परीक्षांची तारीख…
