: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त ठरणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या निवडणुकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता अन्य चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला नेत्रदीपक यश मिळाले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये दणदणीत यश मिळविताना भाजपने देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचा सपाटून पराभव केला. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या आणि देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण 403 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता तर होतीच, पण या राज्यातील जनता कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा निवडून देत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यावरून यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे व त्यांचा पक्ष भाजप असे दोन्ही पुन्हा राज्यात सत्तेवर येणे कठीण आहे, असे भाकीत वर्तविले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि राज्यातील योगी सरकारने गेली पाच वर्षे केलेली लोकाभिमुख कामे आणि केंद्रातील योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यात मिळविलेले यश या जोरावर योगी आणि भाजपने पुन्हा या राज्यातील सत्ता हस्तगत केली आणि एक नवा इतिहास रचला. हे यश सतके निर्भेळ म्हटले पाहिजे की, भाजपने एकूण 403 जागांपैकी 274 जागा जिंकल्या आणि विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले. म्हणूनच या यशाने आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दुसरे – तिसरे कोणी नाही, तर नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपच पुन्हा एकदा बाजी मारणार यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. कारण केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. ‘मोदी है तो मुमकिन है’ हे यापूर्वी अनेकदा दिसून आले असून सगळ्यांनाच आता ते पटूही लागले आहे आणि या निवडणुकांमध्ये ते अनुभवायला मिळाले. देशावर कोरोनाचे महाभीषण संकट कोसळले तेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळली ती गोष्ट लाजबाबच म्हणायला हवी. केंद्रीय आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि तेथील यंत्रणा यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांच्याशी चर्चाविनिमय करून, प्रसंगी मार्गदर्शन करून संपूर्ण परिस्थिती योग्य तर्हेने हाताळली गेली. तसेच देशभरात यशस्वीपणे राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम यालाही तोड नाही. कोरोना संकटाबरोबरच आलेल्या इतर अन्य संकटांवरही मोदी सरकारने सहज मात केली आणि देशातील विकासाची गंगा थांबू दिली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानसारख्या देशातून सतत होणार्या देशविघातक कारवाया यांनाही आता चांगलाच चाप बसलेला दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या आपल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी हाती घेतलेली ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम. या सगळ्यांचा परिपाक म्हणून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश प्राप्त केले असेच म्हणावे लागेल. म्हणूनच उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून गोव्यामध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या चारही राज्यांमध्ये सलग दुसर्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करण्यात येणार्या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणार्यांवर जोरदार टीका केली. काही लोक भ्रष्टाचार करणार्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थांना बदनाम करत आहेत. आपल्या देशात भ्रष्टाचार करणार्यांविरुद्ध लोकांमध्ये राग आहे हे खरे आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोर्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे आणि भाजपने 2014 मध्ये प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती. तोच प्रामाणिकपणा पाहून जनतेने 2019 मध्ये पुन्हा भाजपला निवडून दिले. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ करण्याचे आश्वासन जनतेला दिल्यानंतर त्याच दिशेने मार्गक्रमण सुरू असताना सरकारला आणि सरकारी तपास यंत्रणांना बदनाम करणार्याचा प्रयत्न करणार्यांचाही मोदींनी खरपूस समाचार घेतला. उत्तर प्रदेशात 37 वर्षांनंतर लागोपाठ दुसर्यांदा सत्तेत येण्याचा विक्रम भाजपने केला. भाजपने मोदी आणि योगी यांच्यावरच प्रचारात सारे लक्ष केंद्रित केले होते. लागोपाठ दुसर्यांदा सत्ता मिळाल्याने योगी हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काही वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची स्वप्ने बघणार्या मायावती यांच्या बसपाचा उत्तर प्रदेशात पार धुव्वा उडाला.ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.शेतकरी आंदोलन, कोरोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला़ असून त्यातच आगामी 2024 च्या निवडणुकांची नांदी स्पष्ट दिसत आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच ; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केल़े पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसपच्या अस्तित्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केल़े विशेष म्हणजे मोदींचा करिष्मा आणि भाजपच्या लाटेत काँग्रेस, ममता बॅनर्जी, मायावती, एमआयएमचे ओवेसी आदींची धूळधाण उडालेली दिसली.
Similar Posts
अरेच्च्या ! लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी – १२ लबाड भावानी भरले अर्ज
छत्रपती संभाजी नगर – सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु झाले आहेत.छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड जिल्ह्यात चक्क १२ जणांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यावर महिलांचा फोटो लावला पण इतर कागदपत्र स्वतःच्या नावाची असल्याने ते पक्स्डले गेले . त्यामुळे या लबाड भावांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेमुख्यमंत्री माझी लाडकी…
बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कामगारांवर सत्ताधारी शिवसेनेकडून अन्याय
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईचित्रपटाच्या टीझरचां प्रदर्शन सोहळा
धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन…
पाडव्याच्या तोंडावर सोने प्रचंड महागले
मुंबई: भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा पवित्र मुहूर्तांवर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५…
वानखेडे यांची बदली की निलंबन?
मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय…
वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर ४० मिनिटे उशिरा उपचार- डॉक्टर बडतर्फ तर नर्स निलंबित
मुंबई/ वरळी सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमी पुरी दांपत्याला नायर मध्ये उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर उपचार करण्यास तब्बल ४० मिनिटे उशीर झाल्याने त्या दांपत्याचा मृत्यू झाला असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणी डॉ.शशांक यांना बडतर्फ करण्यात आले तर नर्स प्रीती हिला निलंबित करण्यात आले असून तिची खाते निहाय चौकशी सुरू आहे ३ नोव्हेंबर…
