मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नयन कदम, करण मेनन, कुणाल माईणकर यांच्या पुढाकाराने ओबेरॉय स्कायसिटी समोर दत्तपाडा मार्गावर स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मीना वैशंपायन, उद्योजक उल्हास वैशंपायन, प्रख्यात चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भारत कदम, नगरसेविका आसावरी पाटील, एअर इंडिया च्या माजी अधिकारी मीना इंगळे नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींचे खरे नांव हेमा होते परंतु पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘लतिका’ या नाटकावरुन लता हे नांव रुढ झाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ख्यातनाम सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या चरित्राचा उल्लेख करुन ऐ मेरे वतनके लोगो हे ऐतिहासिक आणि अजरामर गीत कसे निर्माण झाले याची सविस्तर माहिती दिली आणि त्यात सुमन कल्याणपूर यांच्याकडून संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गाण्यासाठी तयारी करवून घेतली पण ऐनवेळी लतादीदींकडून हे गाणे गाऊन घेतले. यात लतादीदींचा कोणताही दोष नव्हता या शब्दांत सुमनताईंनी दीदींना दोषमुक्त केले. ही बाब गेल्या सहा महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ दीदींच्या हयातीत हा मोठा गैरसमज दूर होणे ही लतादीदी आणि सुमनताई यांच्या चाहत्यांसाठी सुखावणारी बाब आहे. दिलीप ठाकूर यांनी लतादीदीच्या आयुष्यातील विविध घटनांचा उल्लेख करुन आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. भारत कदम यांनी आपल्या आयुष्यात सकाळी उठण्यापासून रात्री झोप लागेपर्यंत लतादीदींच्या गाण्याभोवतीच आपण फिरत असतो, भूपाळी असो, जागो रे जागो रे पासून तर अंगाई गीतापर्यंत सर्वत्र लता लता आणि लतामय असे आपले जीवन व्यापलेले असते, अशा शब्दांत दीदींना श्रद्धांजली वाहिली. जनरल करीअप्पा उड्डाण पुलाजवळ भारतीय जनता पक्षाच्या विद्यमाने श्रद्धांजली चा कार्यक्रम नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केला होता. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करुन आणि दीदींच्या तसबिरी समोर पुष्पांजली अर्पण करुन या महान गायिकेला आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा तर्फे धरमवीर ठाकूर यांनी विशेष चित्रफीत तयार केली होती. वॉर्ड अध्यक्ष वेंकटेश क्यासाराम, शाम कदम, स्वप्नील सागवेकर, जयेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर, थोर व्यंगचित्रकार, शिवसेना नेते राज ठाकरे यांच्या साक्षीने, संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनाखाली ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लतादीदींनी गायिलेले अजरामर गीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दीदींच्या दरम्यान झालेला संवाद, या संवादाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये प्रकर्षाने केलेला उल्लेख लतादीदींनी गायिलेली विविध गाणी यांचा अत्यंत कौशल्याने धरमवीर ठाकूर यांनी आपल्या चित्रफीतीत समावेश केला आहे.
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमशिदीवर लावलेल्या भोंग्यांचा वाद – पोलिसांना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.कांनदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. स्थानिक…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
सायन मध्ये बिल्डरसाठी एकवीस झाडांची कत्तल
मुंबई/ एकीकडे आरेचे जंगल वाचवण्यासाठी शिवसेनेने सतेत असताना आक्रमक भूमिका घेतली होती पण दुसरीकडे मुंबई महापालिकेत पालिकेची सत्ता असताना पालिकेचे वृक्ष प्राधिकरण दरवर्षी हजारो झाडांच्या कतल करण्यास परवानगी देत आहेे. त्यामुळेच गेल्या ११वर्षात ४० हजार झाडांची कत्तल करण्यात आली त्यात बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी २१ हजार पाचशे झाडे तोडण्यात आलीी.सायन कोळीवाडा सरदार नगर२ त्रिलोचन इमारतीच्या…
आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे
कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहेशुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत…
आर्यन खानला जामिन नाकारला
मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खान याच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणारआहे. मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर…
घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अधिवेशनातील वातावरण तापले
नागपूर – सध्या नागपूर मध्ये सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या नागपूर मधील जमीन खोटल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांच्या जमीन घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु…
