मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नयन कदम, करण मेनन, कुणाल माईणकर यांच्या पुढाकाराने ओबेरॉय स्कायसिटी समोर दत्तपाडा मार्गावर स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मीना वैशंपायन, उद्योजक उल्हास वैशंपायन, प्रख्यात चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भारत कदम, नगरसेविका आसावरी पाटील, एअर इंडिया च्या माजी अधिकारी मीना इंगळे नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींचे खरे नांव हेमा होते परंतु पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘लतिका’ या नाटकावरुन लता हे नांव रुढ झाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ख्यातनाम सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या चरित्राचा उल्लेख करुन ऐ मेरे वतनके लोगो हे ऐतिहासिक आणि अजरामर गीत कसे निर्माण झाले याची सविस्तर माहिती दिली आणि त्यात सुमन कल्याणपूर यांच्याकडून संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गाण्यासाठी तयारी करवून घेतली पण ऐनवेळी लतादीदींकडून हे गाणे गाऊन घेतले. यात लतादीदींचा कोणताही दोष नव्हता या शब्दांत सुमनताईंनी दीदींना दोषमुक्त केले. ही बाब गेल्या सहा महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ दीदींच्या हयातीत हा मोठा गैरसमज दूर होणे ही लतादीदी आणि सुमनताई यांच्या चाहत्यांसाठी सुखावणारी बाब आहे. दिलीप ठाकूर यांनी लतादीदीच्या आयुष्यातील विविध घटनांचा उल्लेख करुन आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. भारत कदम यांनी आपल्या आयुष्यात सकाळी उठण्यापासून रात्री झोप लागेपर्यंत लतादीदींच्या गाण्याभोवतीच आपण फिरत असतो, भूपाळी असो, जागो रे जागो रे पासून तर अंगाई गीतापर्यंत सर्वत्र लता लता आणि लतामय असे आपले जीवन व्यापलेले असते, अशा शब्दांत दीदींना श्रद्धांजली वाहिली. जनरल करीअप्पा उड्डाण पुलाजवळ भारतीय जनता पक्षाच्या विद्यमाने श्रद्धांजली चा कार्यक्रम नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केला होता. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करुन आणि दीदींच्या तसबिरी समोर पुष्पांजली अर्पण करुन या महान गायिकेला आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा तर्फे धरमवीर ठाकूर यांनी विशेष चित्रफीत तयार केली होती. वॉर्ड अध्यक्ष वेंकटेश क्यासाराम, शाम कदम, स्वप्नील सागवेकर, जयेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर, थोर व्यंगचित्रकार, शिवसेना नेते राज ठाकरे यांच्या साक्षीने, संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनाखाली ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लतादीदींनी गायिलेले अजरामर गीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दीदींच्या दरम्यान झालेला संवाद, या संवादाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये प्रकर्षाने केलेला उल्लेख लतादीदींनी गायिलेली विविध गाणी यांचा अत्यंत कौशल्याने धरमवीर ठाकूर यांनी आपल्या चित्रफीतीत समावेश केला आहे.
Similar Posts
ओमीक्रोन ची मुंबईत एंट्री २ रुग्ण सापडले, संपर्कातील ३२० जन संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई/ संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या ओमी क्रोन ने आता मुंबईत सुधा एंट्री केली असून आफ्रिकेतून आलेला एक इसम आणि त्याच्या सोबत राहिलेली पण अमेरिकेतून आलेली त्याची मैत्रीण या दोघांनाही ओमी क्रोन ची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील ५ आणि आणि इतर ३१५ अशा…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा १० जानेवारीला फैसला
दिल्ली महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष सुरु आहे त्यावर सरवोचच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र हि सुनावणी ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावी अशी मागणी शैवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे त्यावर आता १० जानेवारीला सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे याच सुनावणीत तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा फैसला होण्याचीही शक्यता आहे ठाकरे गटाला ही केस…
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयलव्ह जिहाद
जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे होते पण या देशाच्या दुर्दैवाने आज केंद्रात देव धर्म श्रद्धा आणि आस्था यांनी महत्व देणारे सरकार असल्याने धार्मिक विद्वेशाची भावना समाजात रुजायला लागली आहे लव्ह जिहाद हा त्याचाच…
काश्मीर फाईल चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग केला मोकळा -हायकोर्टाने फेटाळली याचिका
काश्मीर फाईल या चित्रपटाचे कथानक काश्मिरी पंडितांना 1990 मध्ये काश्मीर मधून केलेल्या तर आंतरावर व परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट सत्य घटना वर आधारित आहे चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला आक्षेप घेत उत्तर प्रदेश रहिवासी इंतेजार हुसेन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालय धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. काश्मिरी पंडित यांच्या जीवनावर आधारित असलेली…
