मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नयन कदम, करण मेनन, कुणाल माईणकर यांच्या पुढाकाराने ओबेरॉय स्कायसिटी समोर दत्तपाडा मार्गावर स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मीना वैशंपायन, उद्योजक उल्हास वैशंपायन, प्रख्यात चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भारत कदम, नगरसेविका आसावरी पाटील, एअर इंडिया च्या माजी अधिकारी मीना इंगळे नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींचे खरे नांव हेमा होते परंतु पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘लतिका’ या नाटकावरुन लता हे नांव रुढ झाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ख्यातनाम सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या चरित्राचा उल्लेख करुन ऐ मेरे वतनके लोगो हे ऐतिहासिक आणि अजरामर गीत कसे निर्माण झाले याची सविस्तर माहिती दिली आणि त्यात सुमन कल्याणपूर यांच्याकडून संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गाण्यासाठी तयारी करवून घेतली पण ऐनवेळी लतादीदींकडून हे गाणे गाऊन घेतले. यात लतादीदींचा कोणताही दोष नव्हता या शब्दांत सुमनताईंनी दीदींना दोषमुक्त केले. ही बाब गेल्या सहा महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ दीदींच्या हयातीत हा मोठा गैरसमज दूर होणे ही लतादीदी आणि सुमनताई यांच्या चाहत्यांसाठी सुखावणारी बाब आहे. दिलीप ठाकूर यांनी लतादीदीच्या आयुष्यातील विविध घटनांचा उल्लेख करुन आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. भारत कदम यांनी आपल्या आयुष्यात सकाळी उठण्यापासून रात्री झोप लागेपर्यंत लतादीदींच्या गाण्याभोवतीच आपण फिरत असतो, भूपाळी असो, जागो रे जागो रे पासून तर अंगाई गीतापर्यंत सर्वत्र लता लता आणि लतामय असे आपले जीवन व्यापलेले असते, अशा शब्दांत दीदींना श्रद्धांजली वाहिली. जनरल करीअप्पा उड्डाण पुलाजवळ भारतीय जनता पक्षाच्या विद्यमाने श्रद्धांजली चा कार्यक्रम नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केला होता. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करुन आणि दीदींच्या तसबिरी समोर पुष्पांजली अर्पण करुन या महान गायिकेला आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा तर्फे धरमवीर ठाकूर यांनी विशेष चित्रफीत तयार केली होती. वॉर्ड अध्यक्ष वेंकटेश क्यासाराम, शाम कदम, स्वप्नील सागवेकर, जयेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर, थोर व्यंगचित्रकार, शिवसेना नेते राज ठाकरे यांच्या साक्षीने, संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनाखाली ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लतादीदींनी गायिलेले अजरामर गीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दीदींच्या दरम्यान झालेला संवाद, या संवादाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये प्रकर्षाने केलेला उल्लेख लतादीदींनी गायिलेली विविध गाणी यांचा अत्यंत कौशल्याने धरमवीर ठाकूर यांनी आपल्या चित्रफीतीत समावेश केला आहे.
Similar Posts
ग्रामपंचायतींचां निवडणुकीत बंडखोरांची सरशी -शिंदे गटाने जिंकल्या 40 जागा सेनेला 27
मुंबई/ महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा शिंदे गटाची सरशी झाली आहे अगदी काही दिवसांपूर्वीच बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने 40 जागा जिंकून शिवसेनेला चौथा क्रमांकावर ढकलले आहे त्यांचे हे यश म्हणजे त्यांच्या बंडखोरीला जनतेकडून मिळालेली मूकसंमतीच म्हणावी लागेल271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 81 जागा जिंकल्या आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादीने 53 जागा मिळाल्या शिंदे गटाला 40 तर…
आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा निषेध
मुंबई : माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनवाब मलिक यांना अटक
मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला
मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच तसेच नोटीस बजावल्या आमदारांवर 12 जुलै पर्यंत कारवाई करू नये असेही न्यायालयाने आदेश दिले आहेतविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती . त्यांनी या नोटिशिला सर्वोच्च न्यायालयात…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
