मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नयन कदम, करण मेनन, कुणाल माईणकर यांच्या पुढाकाराने ओबेरॉय स्कायसिटी समोर दत्तपाडा मार्गावर स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मीना वैशंपायन, उद्योजक उल्हास वैशंपायन, प्रख्यात चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भारत कदम, नगरसेविका आसावरी पाटील, एअर इंडिया च्या माजी अधिकारी मीना इंगळे नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींचे खरे नांव हेमा होते परंतु पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘लतिका’ या नाटकावरुन लता हे नांव रुढ झाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ख्यातनाम सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या चरित्राचा उल्लेख करुन ऐ मेरे वतनके लोगो हे ऐतिहासिक आणि अजरामर गीत कसे निर्माण झाले याची सविस्तर माहिती दिली आणि त्यात सुमन कल्याणपूर यांच्याकडून संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गाण्यासाठी तयारी करवून घेतली पण ऐनवेळी लतादीदींकडून हे गाणे गाऊन घेतले. यात लतादीदींचा कोणताही दोष नव्हता या शब्दांत सुमनताईंनी दीदींना दोषमुक्त केले. ही बाब गेल्या सहा महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ दीदींच्या हयातीत हा मोठा गैरसमज दूर होणे ही लतादीदी आणि सुमनताई यांच्या चाहत्यांसाठी सुखावणारी बाब आहे. दिलीप ठाकूर यांनी लतादीदीच्या आयुष्यातील विविध घटनांचा उल्लेख करुन आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. भारत कदम यांनी आपल्या आयुष्यात सकाळी उठण्यापासून रात्री झोप लागेपर्यंत लतादीदींच्या गाण्याभोवतीच आपण फिरत असतो, भूपाळी असो, जागो रे जागो रे पासून तर अंगाई गीतापर्यंत सर्वत्र लता लता आणि लतामय असे आपले जीवन व्यापलेले असते, अशा शब्दांत दीदींना श्रद्धांजली वाहिली. जनरल करीअप्पा उड्डाण पुलाजवळ भारतीय जनता पक्षाच्या विद्यमाने श्रद्धांजली चा कार्यक्रम नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केला होता. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करुन आणि दीदींच्या तसबिरी समोर पुष्पांजली अर्पण करुन या महान गायिकेला आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा तर्फे धरमवीर ठाकूर यांनी विशेष चित्रफीत तयार केली होती. वॉर्ड अध्यक्ष वेंकटेश क्यासाराम, शाम कदम, स्वप्नील सागवेकर, जयेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर, थोर व्यंगचित्रकार, शिवसेना नेते राज ठाकरे यांच्या साक्षीने, संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनाखाली ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लतादीदींनी गायिलेले अजरामर गीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दीदींच्या दरम्यान झालेला संवाद, या संवादाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये प्रकर्षाने केलेला उल्लेख लतादीदींनी गायिलेली विविध गाणी यांचा अत्यंत कौशल्याने धरमवीर ठाकूर यांनी आपल्या चित्रफीतीत समावेश केला आहे.
Similar Posts
25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणे यांचे चित्र
मुंबई/ चलनी नोटा वर कोणाचे चित्र असावे यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चित्र मोर्ब करून लावून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात 5 तक्रार दाखल केली आहे.तसेच भाजपने संताप व्यक्त केला आहे…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६व्या जयंतीनिमीत्त पवित्र स्मृतीस मराठी पत्रकार संघात विनम्र अभिवादन
मुंबई-अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह आणि हुंड्याविरोधात आपल्या लेखणीची आणि वाणीची खणखणीत तलवार करुन अखंडपणे लढणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमीत्त त्यंच्या पवित्र स्मृतीस काल मुंबई मराठी पत्रकार संघात विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे, कार्यवाह विष्णू सोनवणे व इतरांनी प्रबोधनकारांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर
ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले….
दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी
मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला…
नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
