उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.
Similar Posts
भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर
मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या अक्षरशः नाकी दम आला याचे कारण अग्निशमन दलाकडे जी शिडी आहे ती फक्त २८ मजल्यांपर्यंतच पोहोचू शकते .आणि आग तर ४२ व्या मजल्यावर लागली होती.त्यातच आगीमुळे इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने या आगीत अडकलेल्या…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर एक दिवसअगोदरच १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार
शिवसेनेच्या १६ आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच…
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
:चैत्यभूमी येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनर्वाण दिनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,मुंबई शहर चे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आमदार प्रवीण दरेकर, संजय शिरसाट,मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रकाश…
मी संविधानाचा रक्षक आहे कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही- मोदी
मुंबई/मी पुन्हा स्तेवर आलो तर सविधान बदलेन अशा विरोधकांकडे अफवा पसरवल्या जात आहे परंतु कुणाचा बाप आला तरी त्याला संविधान बदलता येणार नाही. कारण मी संविधानाचा रक्षक आहे असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना सांगितले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तसेच शरद पवारांवर ही कडाडून हल्ला केलाआज शिवाजी…
