उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.
Similar Posts
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट कमलखांवर कारवाईचे आदेश
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्टकमलखांवर कारवाईचे आदेशमुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक व प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. याचदरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टनंतर मुख्यमंत्री…
भाजपा/ शिंदे गटातील वाद वाढलाशिंदेंच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार!
मुंबई/ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना आणि भाजपतील वाद शिगेला पोहचला आहे.भाजपच्या ऑपरेशन लोटासमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून वाद मिटवण्याचा कवायत सुरू झाली आहे.राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र नाही. भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका बसू लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला….
महाराष्ट्र एकीकरण समिती मधील फुटिमुळे भाजपचा मोठा विजय-बेळगावात मराठी अस्मितेचे पानिपत
बेळगाव/महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात सीमा भागातील मराठी अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या आणि कर्नाटक सरकारशी सातत्याने संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती मध्ये फूट पडुन मते विभागली गेल्यामुळे बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि मराठी अस्मितेचे बेळगावात अक्षरशः पानिपत झाले महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी हा फार मोठा धक्का समजला जास्त आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात बेळगाव हे लढ्याचे मुख्य…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
नवे तीन साहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिकेत
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेत पदभरती आणि पदोन्नती रखडल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना प्रभारी म्हणून कार्यभार सोपवला गेला होता. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवे तीन सहाय्यक आयुक्त यांच्या नेमणुका करून जनतेला दिलासा दिला आहे पालिकेत पी उत्तर विभागात कुंदन वळवी, एफ…
महापौर कार्यालयातील फाईल गहाळ भाजपची पोलिसांकडे तक्रार
मुंबई/ महापौर कार्यालयातून औषध खरेदी प्रस्तावाची जी फाईल गहाळ झाली त्या प्रकरणी भाजपने सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून या प्रकरणात महापौर कार्यालयातील सर्वांची चौकशी होणार आहे.पालिका रुग्णालय आणि दवाखाने यांच्यासाठी औषध खरेदी बाबतचा एक प्रस्ताव स्थायी समिती मधील काही जेष्ठ नगरसेवकांनी त्रुटी दाखवून उपसूचना पुन्हा महापौर कार्यालयाकडे पाठवला होता पण तो तिथे ८ महिने…
