उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.
Similar Posts
काशिमीरा येथे हायवेवरच्या टारझन डान्सबारवर पोलिसांची धाड! २१ जनावर गुन्हा दाखल
भाईंदर/ पनवेल आणि मुंबईत डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचा अनेकदा दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वी चक्क गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरही पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे, मुंबईतील डान्स बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणि केंद्रस्थानी आला होता. आता, मुंबईतील काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत ५ बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर…
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खड्डे बुजविण्याचे अहोरात्र सुरु राहणार मुंबई, दि. १६ : – मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे. ठाणे जिल्हा आणि…
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणाली मार्फत लोकार्पण
कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, दि.१०, (जिमाका): देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
मुंबई श्रीचे तीन वर्षांनंतर दणदणीत पुनरागमन – येत्या शुक्रवार-शनिवारी स्पर्धेचे शहाजी राजे क्रीडा संकुलात धमाकेदार आयोजन
मुंबई, दि.२६ (क्री.प्र.)- कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या फिटनेस इंडस्ट्रीला तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई श्रीचे पीळदार ग्लॅमर अनुभवता येणार आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि मान-सन्मान असलेल्या मुंबई श्रीला यंदाही स्पार्टन न्यूट्रिशनचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला होणार्या या स्पर्धेला सलग तिसर्या वर्षी स्पार्टन मुंबई श्री म्हणून ओळखले जाईल. त्यामुळे पुन्हा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी
मुंबई / रविवारी झालेल्या 608 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप वरच्या श्रधेपोटी भक्तांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली आणि या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.तर या निवडणुकीत शिवसेनेला फुटीचा फटका बसून शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान हा निकाल म्हणजे भविष्यातील नांदी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.रविवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जवळपास 80 टक्के मतदान झाले…
