उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.
Similar Posts
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली…
रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडाक ताशेरे
दिल्ली/ रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमधील महापालिका वर काडक ताशेरे ओढले आहेतगुजरात,हरयाणा आणि पंजाब मधील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंड पीठाने रेल्वेची सुधा कडकं शब्दात कानउघाडणी केली शहरात आणि खास करून रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर झोपडपट्ट्या तयार होतातच कशा स्थानिक प्रशासन काय करीत असते…
नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद
मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार…
योगी बाबांनी आणलेल्या यूपी धर्मांतर कायद्यात चांगूर बाबा आणि त्यांचे शिष्य खूप अडचणीत येतील
. हे कलम प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब घेतील! या अहवालात समजून घ्याउत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि आग्रा येथून बेकायदेशीर धर्मांतर उघडकीस आल्यानंतर योगी सरकारची कारवाई सुरूच आहे. मास्टरमाइंड चांगूर बाबा, अब्दुल रहमान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध यूपी धर्मांतर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. • चांगूर बाबा, अब्दुल रहमान सारख्या अवध धर्मांतराच्या प्रमुखांवर सरकारची कडक भूमिका• त्या सर्वांवर…
देशातील बलाढ्य कुस्ती राज्यांचा मुंबईत ‘मुकाबला’
२६ जानेवारीला ‘कुस्ती महादंगल २०२६’मध्ये दिग्गज पैलवानांची रणधुमाळी मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राममुंबई :देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारत आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’च्या रूपाने साजरा होणार आहे.अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत…
फटके फोडण्यावरून झाला वादनिरपराध तरुणाचे आयुष्य झाले बाद
मुंबई – आजकालच्या तरुणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात . मात्र हे वाद तत्काळ मिटवले जात नसल्याने या वादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अँटॉप हिलमध्ये अशाच एका घटनेत फाटक्या वरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला . या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे .शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून…
