मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
गणेशविसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम तलावात – कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले
.मुंबई – २०२० नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांवर निर्बंध लादले. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणे, विकणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली. जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली. त्याऐवजी चिकणमातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आदेश देण्यात आले. पॉप लवकर विरघळत नाही त्या ऐवजी चिकन माती…
ठाकरे विरुद्ध ठाकरे राडेबाजी सुरू
तर महाराष्ट्रात या लोकांना सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारासंभाजी नगर/बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध आता मनसेही चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि शेन फेकले त्यामुळे आता ही राडेबाजी आणखी वाढत जाणार असल्याचे दिसत आहे हिंगोलीत…
महापालिका व नगर परिषदेतील नगर सेवकांच्या संख्येत वाढ होणार
मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर…
मणिपूर चकमकीत १० कुकी बंडखोर ठार
इंफाळ – मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाने दहा कुकी बंडखोरांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात जातीय संघर्ष उफाळलेला आहे. येथे मूलतत्ववाद्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हे कुकी बंडखोर शेतात काम करणाऱ्यांवर…
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन…
जागा वाटपावरून महायुतीत मतभेद – बारा जागांचा प्रस्ताव शिंदे गटाला नामंजूर
मुंबई/आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून इंडिया आघाडी पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुतीतही मतभेद असल्याचे दिसून येत आहे माहिती मध्ये सामील असलेल्या अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात आता जागा वाटपावरून तू तू मै मै सुरू झालेली आहे शिंदे गटाचे खासदार कीर्तीकर यांनी लोकसभेच्या 12 जागांचा प्रस्ताव पेटला आहे मागील निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे…
