मुंबई: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका उपाध्ये यांनी केली. राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,
Similar Posts
असा घडला बाळासाहेबांचा ‘सामना’ !. . . . .
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर सहा वर्षापूर्वी म्हणजे 1960 साली 13 ऑगस्टला बाळासाहेबांनी संपूर्ण व्यंगचित्राला वाहिलेले,(जगातील पहिले असं म्हटलं तरी चालेल) मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्यानं आणि वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे उर्फ दादा यांच्या मार्गदर्शन आणि…
चिल्लरांच्या गाड्या काय फोडता फडणवीस , शिंदे , शरद पवार , ठाकरेंच्या गाड्या फोडा ! प्रकाश आंबेडकरांचे आव्हान
मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
अ़ॉगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही….
दिल्लीतील लाल किल्ला दहशतवाद्यांच्या रडारवर?
नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील काही प्रमुख भागांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर अशी पोस्टर्स लावल्याची बाबही तपासात समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान हे पोस्टर्स चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सोशल मीडियावरून परस्पर…
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली.या महोत्सवात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार असून 21…
संभाजी नगर मधील राड्या प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा दाखल
संभाजी नगर – रामनवमी आणि रमजान या दोन सणांच्या पार्शवभूमीवर संभाजी नगर मध्ये दोन गटात राडा होऊन दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली काही वाहने जाळण्यात आली या घटनेने शहारत तणाव निर्माण झाला आहे छत्रपती संभाजीनगर शहरात) बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरूच…
