दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .
Similar Posts
ऐश्वर्या पाठोपाठ अमिताभची सुधा चौकशी होणार?
दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे…
आज मानापमान नाट्यात चिपीचे लोकार्पण; पद मोठे पण पत्रिकेवर नाव छोटे राणे नाराज
ठाकरे राणे एकाच व्यासपीठावरसावंतवाडी- आज कोकणातील बहुचर्चित चिपी लोकार्पण होत असून त्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये काही राडेबाजी होऊ नये म्हणून विमानतळ परिसरात प्रंचड फौजफाटा तैनात करण्यात आला आहेकोकणातील चिपी येथे २७४ हेक्टर जागेवर हा विमानतळ बांधण्यात आला…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले
पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर…
आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार
औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून…
हेस्टरचे उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढले
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – भारतातील पशु आरोग्यसेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या हेस्टर बायोसायन्सेस लिमिटेडने. जून २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून ६० टक्क्यांनी वाढ दर्शवित आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण महसूल ५८.५१ कोटी रुपये मिळाला असून मागील तिमाहीच्या तुलनेत हे ३८.८८. कोटी रुपये ची वाढ आहे जे एकूण ५० टक्के…
