दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .
Similar Posts
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले
शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघनमुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहेकाल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात…
क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते- माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्श्यांची आतषबाजी मुंबई – मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. 1997 साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे…
दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं
श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.
