दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .
Similar Posts
हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत – साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
हुबळी – लव्ह जिहाद सारख्या प्रकरण जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत असा वादग्रस्त सल्ला भाजपच्या खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिला आहे. कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि हिंदूंनी घरामध्ये शस्त्रं बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा…
काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान
बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा…
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
