दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी
लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना…
मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली
मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था ; गाव विकास संघर्ष समितीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
भिवंडी दि 17 भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे ….
शनिवार निकालाचा दिवस! कर्नाटकात सत्तांतर अटळ
बंगळुरू/ शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधासभेसाठी झालेल्या 224 जागांचा निकाल जाहीर होणार आहे एक्झिट पोल क्या सर्व नुसार कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक 120 ते 140 जागा मिळणार आहेत तर भाजपला 80 जागांवर समाधान मानावे लागेल त्यामुळे कर्नाटकातील भाजपची सत्ता जाणार असे एक्झिट पोल वरून दिसत आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते…
काँग्रेसला लागलेली घरघर आणखी वाढणार- गुलाम नबी काँग्रेस मधून आझाद
दिल्ली/ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला कायमचा बायबाय करीत चांगलाच हात दाखवला आहे.आझाद हे काँग्रेस मधून खऱ्या अर्थाने आझाद झाले आहेत आता ते जम्मू काश्मीर मध्ये नवा पक्ष स्थापन करणार आहेत त्यांच्या सोबत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे, दरम्यान आझाद यांच्या पाठोपाठ आणखी काही काँग्रेस नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे…
