भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
कथा दोन हजारांच्या नोटेची; व्यथा नोटाधारकांची !
रिझर्व बँकेने गेल्या शुक्रवारी मोठी घोषणा करून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या. सुमारे सहा वर्षांपूर्वी या नोटा बाजारात सादर केल्या होत्या. रिझर्व बँकेला असे वाटते की मोठ्या प्रमाणावर काळा पैसा या नोटांमध्ये दडलेला आहे किंवा बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच कर चुकवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. याची सत्यता आणखी काही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोल्हापूर दौर्यात सोशल डिसटिंगचा फज्जा
आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने कोल्हापूर/ कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टिंग बाबत उपदेश करणारे नेते स्वतः मात्र या नियमाचे पालन करीत नाहीत काल कोल्हापूर मध्ये हेच बघायला मिळाले कोल्हापूरच्या पाहणी दौर्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोठा फौज फाटा होता. मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे सुधा कोल्हापूरच्या पाहणी दौर्र्यावर होते .या दोन्ही…
शिंदे – ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईत तारीख पे तारीख
दिल्ली – शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईला तारीख पे तारीखचचे ग्रहण लागलेले आहे. आज झालेल्या सुनावणीत युक्तिवाद अपुरा राहिल्याने आता हि सुनावणी २० जानेवारीला होणार आहे, एकीकडे कोर्टात तारीख पे तारीख तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुनावणीत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू झाला आहे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहेएकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले…
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच
मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा केली होती ती संपकरी कर्मचाऱ्यांनी धुडकावली असून एस टी चा संप सुरूच राहणार आहे.सोमवारी उच्च न्यायालयात सरकारणे स्थापन केलेल्या समितीने प्रार्थमिक अहवाल सादर केला. त्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अभ्यास करायला वेळ देण्याची मागणी केली होती…
