भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढणार
मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे ….
नाविकांना हवी आयकरात सूट ; मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर ; केंद्र सरकार कडे भावना कळविण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
“इंटरनेट खंडित करण्याच्या ” गुन्ह्यात” भारत अग्रेसर ! ” बाबतचा लेख.
संगणक, मोबाईल किंवा अन्य तत्सम उपकरणांच्या माध्यमातून सर्व देशांमधील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा मुक्तपणे सर्रास वापर करत असते. त्याच्या वापराचे स्वातंत्र्य जरी सगळ्यांना असले तरी अनेक देश त्या स्वातंत्र्याचा संकोच करतात, त्यावर बंधने घालतात आणि काही वेळा तर इंटरनेट सेवा सुविधाच बंद करतात. नागरिकांवर अशी बंधने घालण्यात आशिया खंडात भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगभरातील 77 देशांनी …
