भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
अखेर दीड वर्षांनी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष रुपाली चाकनकर नव्या अध्यक्षा
मुंबई/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिकामे होते अखेर राष्ट्रवादी चां प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकण कर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहेआघाडी सरकारच्या काळात बराच काळ महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता .त्यानतर फडणवीस सरकारचां काळात औरंगाबादचां माजी महापौर विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी…
कर्नाटकातील ८६५ गावातील इंच न इंच जागेसाठी कायदेशीर लढाई लढू-
अधिवेशनात कर्नाटक विरुद्ध ठराव एकमताने मंजूरनागपूर – कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव कर्नाटक विधानसभेने केला होता . त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्राच्या विधासभेतही मराठी भाषिक ८६५ गावातील एक एक इंच जागेसाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीनलढाई लढू असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या बोमाईं…
धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी
मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईक्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन…
निवडणूका पुढे ढकलण्यास नकार ; सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली
: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर…
सर्व संपकरी कामगारांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे न्यायालयाचे आदेश
एस टी कामगारांचा संप अखेर मिटला?मुंबई/ विलीनीकरण मागणीसाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कामगारांचा संप अखेर मिटला कारण न्यायालयाने एस टी कामगारांना निवृत्ती वेतन आणि ग्रेज्यूटी देण्याचे सरकारला आदेश दिले आहेत तसेच एस टी कामगारांनी 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हावे असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि न्यायालयाचा हा आदेश एस टी कामगारांनी…
