मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
कमला मिलमधील बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने आणि इथे झालेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर पालिकेने इथल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली. कमला मिल कंपाऊंड मधील थोयोब्रोमा रेस्टॉरंट,मॅकडोनाल्ड, शिवसागर हॉटेल, नॅनो कॅफे,स्टारबक्स, बिरा टेंपरूस आणि फूड बाय देविका यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताश्विनी जोशी, डीएमसी प्रशांत सपकाळे आणि वार्ड अधिकारी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयओसाड गावची पाटीलकी
मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे.तशी पत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पाठवली आहे. ममता यांचा हा पत्र प्रपच सुरू होऊन काही तास लोटले नाही तोच दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक बैठक होऊन त्यात शरद पवार यांना यूपीए…
पालिका मुख्यालयात एसआयटी कडून कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु
घोटाळ्यातील पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेमुंबई -मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारा संदर्भात चौकशी केली. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या…
नीतेश राणे यांना न्यायलायचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता नितेश राणी आज उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे .तिथेही जर त्याचा जमीन अर्ज फेटाळला तर मात्र तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण तेवढं तो करणार नाही हायकोर्टात त्याला जमीन नाही मिळाला तर त्याला…
पालिकेचे री ऍक्टिव्ह अस्फाल्ट गेले पावसाच्या पाण्यात वाहून -दादरच्या मारुती मंदिराजवळील खड्डे तसेच कायम
मुंबई/दादर पश्चिम येथील मारुती मंदिर हा परिसर नेहमीच वर्गणीचा असतो त्यामुळे इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणि हाच भर पडलेला आहे पालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी री ऍक्टिव्ह अस्फाल्ट नावाचे तंत्रज्ञान वापरून हे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाखो रुपये खर्चून हे तंत्रज्ञान वापरून सुद्धा मारुती मंदिराजवळील खड्डे आहेत…
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
