मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सालव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 4 ऑक्टोबरला निवडणूक होत असून क्रॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे .मात्र रजनी पाटील या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी क्रॉंग्रेसणे भाजपला त्यांचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे . याबाबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात , नाना पाटोळे यांनी देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी तुम्ही आमच्या 12 आमदारांचे अगोदर निलंबन मागे घ्या मग बघू अशी अट घातल्याचे समजते .मात्र फडणवीस यांनी या बातमीचा इन्कार केला आहे आम्ही कधीही अशा प्रकारची सौदेबाजी करीत नाही असे फडणवीस यांनी संगितले.
Similar Posts
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
सर्व भाजप विरोधी पक्ष शेतकरी संघटनांच्या पाठीशी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई/ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी एकत्र येवून पुकारलेल्या भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला .सर्व भाजप विरोधी पक्षांची ताकत शेतकऱ्यांच्या पाठीशी असतानाही या भारत बंदचां फारसा परिणाम जाणवला नाही . बंदला देशाच्या विविध राज्यांमध्ये समिष्र प्रतिसाद मिळाला .सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या…
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान
बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी
सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर…
