भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत मागणी केली आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..
Similar Posts
फडणवीसांवर सोमवारी हक्कभंग ठराव
नागपूर – दिशा सालियन प्रकरणी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे सोमवारी फडणवीस यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार आहेत . त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार…
केंद्र सरकारच्या विरोधात चार राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर – जाळपोळ दगडफेक ट्रेन जाळली सरकारचा” अग्निपथ” पेटला
दिल्ली/ बहुमताच्या जोरावर चुकीचे नियम चुकीचे कायदे आणि चुकीचे योजना लोकांच्या गळी मारण्याचे मोदी सरकारचे उद्योग आता लोक खपवून घ्यायला तयार नाही म्हणूनच केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि सर्वत्र तोडफोड जाळपोळ करीत आहेसरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेत तरुणांना लष्करात घेणार पण त्यातील 25 टक्के तरुणांना कायम…
अतिक्रमण हटवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला अटक
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
तरुणाईला शेअर बाजाराचे ज्ञान मिळण्यासाठी प्रशिक्षणाची गरज
.: एन एम आय टी डी ने दिला शेर बाजार चा नारा – शेअर बाजार २०२२”शेअर बाजार हा विषय कायमस्वरूपी सगळ्यांच्याच चर्चेचा विषय आहे. शेअर बाजारात झालेली चढ आणि घसरण हा त्यातला कळीचा मुद्दा. एक चांगला गुंतवणूकदार नेहमीच बाजारातील परिस्थितीचा फायदा घेतो आणि नफा कमावतो. पण सर्वांनाच ते जमत नाही. तसेच गेल्या काही काळापासून तरुणाईचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
