भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत मागणी केली आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..
Similar Posts
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती…
धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी
मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण…
.तर सर्व मुंबईसह सर्व पालिका निवडणुका पावसाळ्यात होणार
दिल्ली – ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. कारण आम्ही कधीही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सदर केले आहे . त्यामुळे पुढील सुनावणीत जर न्यायालयाने निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तर पावसाळ्यात सुधा निवडणुका होऊ शकतात असे संकेत निवडणूक आयोगाने…
