भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत मागणी केली आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमाजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
भोईवाड्यात मेगा शिबीर
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १४.१.२०२३ रोजी भोईवाड्यातील भावसार समाज मंदिर येथे आयुष्यमान भारत हेअल्थ अकाउंट कार्ड म्हणजेच आभा कार्डाचे मेगा शिबीर आयोजित केले होते.सुमारे ५०० हुन अधिक स्थानिक नागरिकांनी ह्या मेगा शिबिराचा लाभ घेतला. स्थानिक लोकप्रिय आमदार वडाळा विधानसभा कालीदास कोळंबकर यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने हे शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराऊत यांच्यावर सोमय्या व राणे यांचा हल्ला – सेना भाजपा मधे मोठा राडा होण्याची शक्यता
: मुंबई/ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे आरोप केले होते त्यावर नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला त्यामुळं सेना भाजपतील ही लढाई आता हाथ घाईवर आली आहे.संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांनी ठाकरेंचे अलीबागच्या कोलाई गावातील 19 बंगले दाखवावेत दाखवले तर मी राजकारण सोडीन ने…
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययेत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार अब्दुल सत्तार यांची हाकलपट्टी होण्याची शक्यता -शिरसाट- सरवणकर यांना संधी?
मुंबई/गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींची चर्चा केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जुलै महिन्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेनव्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीतील काही आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची…
पवारांच्या भेटीमुळे केजरीवालचे बळ वाढले.
मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. पवारांनीही त्याक्षणी दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असा शब्द केजरीवाल यांना दिला. बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट…
