भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत मागणी केली आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..
Similar Posts
जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल
मुंबई -येत्या 26 तारखेला आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली न गेल्यास या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करू व महाराष्ट्रातील खासदार व आमदार यांना तृतीयपंथ याद्वारे बांगड्यांचा आहेर त्यांच्या घरी जाऊन देवू व त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित महाचिंतन बैठक मध्ये…
नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महाविकास आघडीची सरर्शी
मुंबई/महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळे लढूनही महा विकास आघाडीची सरशी झाली असून भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला यश आले आहे महाविकस आघाडीने सर्वाधिक ६६ नगरपंचायत जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला फक्त २२नगर पंचायती आल्या मात्र भाजपने सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने ३४४ काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्यानगर पंचायतीच्या दोन…
शिवसेना आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका धनुष्यबाण गोठवले-शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा बंदी
मुंबई/ शिवसेना आणि सेनेचे निवडणूक चिन्हं असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .मात्र निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाना मोठा धक्का दिला आहे तसेच शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि…
संजय राऊत यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई/ मनी लॉडरिंग प्रकरणात गेल्या 101 दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत याना अखेर आज पी आई ए एल न्यायालयाने 2 लाखांचा जामीन मंजूर केला आणि संजय राऊत यांची जवळपास तीन महिन्यांनी सुटका झाली.पी आय ए एल न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात राऊत यांच्या अर्जावर सुनावणी झाली .यावेळी न्या. देशपांडे यांनी ई डी ची…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १४ शहीद- अपघात की घातपात?
कुंनुर( तामिळनाडू)/ खराब वातावरणात हेलिकॉप्टर चां प्रवास किती धोकादायक असतो याची पुन्हा एकदा प्र्च्र््र्च्र्र्च्र्््र्च्र््र्च्र्र्च प्रचिती आली आली काही वर्षांपूर्वी आंद्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉफ्टरला डोंगराळ भागात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.काल तशीच भयंकर दुर्घटना तामिळनाडूतील निलगिरी पर्वत परिसरातील डोंगराळ भागातील जंगलात घडला लष्कराचे एक हेलिकॉप्टर कुंनुरच्या जंगलात कोसळून त्यात लष्कराचे चीफ डिफेन्स…
