भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत. शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेला नागरिक या दुर्घटनेत मयत झाला तर महिला, नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होऊन मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे…
Similar Posts
आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचा महामोर्चा! संघर्षाचा निर्धार
नागपूर/ नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही…
राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण
कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे,…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयओसाड गावची पाटीलकी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते की देशाला स्वातंत्र्य मिळाले की काँग्रेस पक्ष बरखास्त करून टाका त्यावेळी गांधीजींचे कुणी एकले नाही पण 75 वर्षांनी नियतीने आज अशी वेळ आणली आहे की काँग्रेस पक्षाला कुणी बरखास्त करण्याची आवश्यकता नाही काँग्रेस स्वतःच शेवटच्या घटका मोजत आहे आणि अशा पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! 125 वर्षाची पार्श्वभूमी…
मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी पक्षातील नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव
मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.युतीची चर्चा जरी…
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी ‘रायगड टुडे’चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते)…
