भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत. शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेला नागरिक या दुर्घटनेत मयत झाला तर महिला, नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होऊन मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे…
Similar Posts
गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले
मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का!…
दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत…
आर्यन खानच्या जामिनावर दोन दिवसात निर्णयाची शक्यता
मुंबई- रेव्ह पार्टी रेड प्रकरणातील मुख्य आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल सुधा पूर्ण झाली नाही त्यामुळे आर्यनला जामिनासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहेआर्यन साठी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी तसेच संजय दत व सलमान खानची केस लढवणारे प्रख्यात वकील सतीश माने शिंदे,अमित देसाई यांच्या सारख्या बड्या वकिलांची फौज तैनात…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययुपी प्रमाणे मुंबईत कधी बुलडोझर फिरणार
मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप…
लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना
मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहेवीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले…
मुकुल रोहतगी यांचा जबरदस्त युक्तीवाद! आर्यनला जामीन मिळणार
मुंबई/ आर्यन खान याच्या जमीन अर्जावर आज बचाव पक्षाचे वकील आणि जेष्ठ कायदे तज्ञ मुकुल रोहतगी यांनी जबरदस्त युक्तिवाद करताना एन सी बी ने आर्यनवर लावलेली कलमे कशी चुकीची आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने .आता आर्यन खाणला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .आज दुपारी न्या.नितीन सांबरे यांच्या समोर आर्यनचां जामीन अर्जावर सुनावणी सुरू…
