भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत. शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेला नागरिक या दुर्घटनेत मयत झाला तर महिला, नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होऊन मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे…
Similar Posts
1 एप्रिल पासून पालिका करणार मालमत्ता कराची वसुली
मुंबई/ करोना काळात पालिकेचा प्रंचड पैसा खर्च झाला तर काही पैसा यशवंत जाधव सारख्या सत्ताधाऱ्यांनी लुटला त्यामुळे पालिकेला भिकेचे डोहाळे लागले आहेत म्हणूनच कोरोना काळात थाबवण्यात आलेली मालमत्ता कराची वसुली येत्या 1 एप्रिल पासून सुरू केली जाणार आहे मात्र 500 चौ.फु.पर्यंतच्या सदनिका मालमत्ता करातून यापूर्वीच वागळलेले असल्याने ज्यांची घरे किंवा व्यावसायिक गळे 500 चौ.फू.पेक्षा अधिक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २१ :- पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे…
ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा
म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित…
फायर बाईक खर्चाचा मुंबईकरांना भुर्दंड का?
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडत आहेत मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचतांना गल्ली बोळा मुळे अडचण येते त्यामुळे फायर बाईक च पर्याय शोधण्यात आला आहे.पण फायर बाईक हा काही सक्षम पर्याय नाही मुळात झोपडपट्ट्या आणि गल्ली बोळ कोणामुळे निर्माण झाले? तसेच बेकायदेशीर पार्किंग कडे कोण दुर्लक्ष…
भिखार ..! अब्दुल सत्तरच्या राजीनाम्याची मागणी
सिल्लोड/ शिंदे शिवसेना पक्षातील फुटीर आमदार आणि सध्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द म्हणताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादीने काल संपूर्ण महाराष्ट्रात सत्तार याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले .त्याच्या फोटोला जोडे मारून त्याचे पुतळे जाळले तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील बंगल्यावर तुफान दगडफेक करून त्याच्या…
