मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
Similar Posts
पोलिसांतील ” माणसां “चे आझाद मैदानात आंदोलन
मुंबई / कर्तव्य पार पाडत असताना घर दार सोडून वेळेचे बंधन झुगारून जनतेचे रक्षण करणारे पोलिस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आमच्याही काही मागण्या आहेत. त्या जर सरकारने पूर्ण केल्या नाही तर , आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष निर्माण करून सत्तेत राहून मागण्या पूर्ण करून घेऊ. असे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी …
सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था – चेंबूरमध्ये ११ जूनला ‘टमरेल मोर्चा’
मुंबई- गेल्या तीन वर्षांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नवीन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव असताना पालिका अधिकारी जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी बुधवार ११ जून रोजी एम पालिका कार्यालयावर ‘टमरेल मोर्चा’ मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अवघ्या १० वर्षांपूर्वी दुमजली बांधण्यात…
एस टी संपात प्रवाशांचा काय दोष ?
गेल्या २० दिवसांपासून महाराष्ट्रात जो एस टी कामगारांचा संप सुरू आहे तो प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे अशावेळी सरकार आणि संपकरी आप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील तर आता प्रवाशांनाच या दोघांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.एस टी कामगारांना पगार कमी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी संप आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार…
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. २7 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
धारावीत गॅस सिलेंडरचा स्फोट; १४ जखमी २ गंभीर
मुंबई/ काल दुपारी धारावीच्या शाहू नगर मधील मुबारक हॉटेल समोर असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत १४जन जखमी झाले असून त्यातील दोघेजण ७० टक्के भाजलेले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ…
महाराष्ट्रात लॉक डाऊन ची शक्यता
मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग…
