मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
Similar Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
रायगड मधील रोह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त
रोहा – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.सोमवारी जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई…
दिशा सालियन कुटुंबाची राष्ट्रपतींकडे धाव
नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी,अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील दिशाच्या…
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटने प्रकरणी रिलायन्सच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल ५ जणांना अटक
मुंबई : मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला जोर आला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार…
आरोप भयंकर पण संशयास्पद!
भाजपला सतेमधे येण्याची खूपच घाई झालेली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकार कोसळण्याच्या तारखा दिल्या जात होत्या पण आता लोकांचा विरोधी पक्षांच्या तरखांवर विश्वासाचं राहिलेला नाही.त्यामुळे आता काही 5 वर्ष हे सरकार पडणार नाही याची खात्री भाजपच्या नेत्यांना पटली आहे त्यामुळे आत तारखा देण्याचे प्रकार थांबले असून आता बदनामीची मोहीम सुरू झाली आहे त्यासाठी किरीट…
