काठमांडू/नेपाळ सरकारच्या नव्या कायद्यानुसार या सोशल मीडिया कंपन्यांची नेपाळमध्ये कार्यालये असणं आणि करदाते म्हणून नोंदणी असणं अनिवार्य करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात नेपाळमध्ये संतापाची लाट उसळली. प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरली, आणि त्यांनी थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर तोडफोड जाळपोळ सुरू केली. हा हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २० आंदोलकांचा मृत्यू झाला असून, २०० हून अधिक जखमी झाले आहेत.त्यामुळे नेपाळमध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे.
नेपाळ सरकारने २०२४ मध्ये एक कायदा देशात लागू केला. हा कायदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी लागू करण्यात आला होता. नेपाळमध्ये ४ सप्टेंबरला २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली. यामध्ये फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांचा समावेश आहे. त्यामागे कारणही तसंच आहे.
नेपाळ ची राजधानी काठमांडू येथे रक्तरंजित असं आंदोलन उसळले आहे.

