अखेर डाव साधला-उद्धव ठाकरेचा राजीनामा
एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाहीत.हिंदुत्वाचे सुधा तसेच होते.हिंदुत्वाला भाजपने आपली मक्तेदारी समजायला लागल्यापासून हिंदुत्वात दोन वाटेकरी असावेत हे भाजपला तेंव्हाही मान्य नव्हते आणि आताही नाही आणि नेमकी हीच गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आली नाही.त्यामुळे भाजपला जवळ करताना याच भाजपमध्ये भविष्यात कधीतरी आपल्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल याची पुसटशी सुधा…
