या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे धावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षात फूट पाडून सत्ता मिळवली जाते.हे त्याचेच उदाहरण आहे पण जे लोक वर्षं वर्ष शिवसेनेत राहून अब्जाधीश झाले आणि आता सतेसाठी भाजप सोबत गेले ते भाजपशी तरी प्रामाणिक राहतील याची काय शाश्वती? पण त्यांच्या बंडखोरी पेक्षा त्यांना बंडखोरी करायला लावणारे लोक अधिक भयंकर आहेत.जे स्स्वार्थासाठी एखाद्या पक्षात (फूट पाडू शकतात ते स्वतःच्या फायद्यासाठी समाजात आणि देशात सुधा फूट पाधायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि शिवसेनेत फूट पडल्यावर आता त्यांचे लक्ष काँग्रेस राष्ट्रवादीवर आहे .
Similar Posts
शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…
एन सी बी ची रेड भाजप कार्यकर्त्या मुळे वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब…
बेळगावमध्ये ऊस आंदोलन चिघळले पोलिसांच्या गाड्या फोडल्या टोलनाके तोडले
बेळगाव/सध्याबेळगावमध्ये ऊसदरवाढ आंदोलन चिघळलं आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. कर्नाटकातही ऊसदराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे याठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून ऊसाला प्रतिटन चार हजारपेक्षा जास्त भाव मिळावा यामागणीसाठी हे…
रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढणार
मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे ….
केंद्राकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज
दिल्ली -केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज मिळणार आहे. या कर्जामुळे महाराष्ट्रातील काही समस्या सुटली तसेच काही प्रकल्प मार्गी लागतील त्यामुळे फडणवीसांनी केंद्राचे आभार मानलेत50 वर्षांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याशिवाय…
दादरच्या कबूतर खाण्याजवळ राडा!न्यायालय आणि पालिकेचा आदेश झुगारून ताडपत्री हटवली
दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र आजही कबूतर खाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या वेळात मोठा जैन समाज दादरच्या कबुतरखाना परिसरात जमला असून पालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात…
