मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.
Similar Posts
आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत केवळ एका दिवसाची सशर्त परवानगी
मुंबई/ मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. २९ तारखेला केवळ एकच दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या…
मनोज जरांगेंचे आमरण उपोषण स्थगीत -सरकारला आणखी एक महिन्याची वेळ
जालना -मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगेसोयरे बाबतची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी काल राज्य…
प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २६) शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. राज्यपालांच्या भाषणाचा…
सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल कोशारी यांनी केली सही
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळामुंबई/ ओबीसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला होता मात्र सरकारने अध्यादेश कडून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची व्यवस्था केली होती .मात्र सुरवातीला राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता त्यामुळे बुधवारी रात्री सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला त्यावर गुरुवारी राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यामुळे…
ड्रग्ज तस्करांच्या पलायन प्रकरणी ९ पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून एका अधिकाऱ्यासह तब्बल 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहेललित पाटील ड्रग्स विक्री प्रकरणी ४ कर्मचारी आणि महिला…
