मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.
Similar Posts
शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार जाहीर – दक्षिण- मुंबईतून यामिनी जाधव तर उत्तर – पश्चिममधून रवींद्र वायकर उत्तर मुंबईतून कॉंग्रेसचे भूषण पाटील
मुंबई – दक्षिण मुंबई आणि उत्तर -पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार कोण याबाबत सर्वाना मोठी उत्सुकता होती अखेर आज या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे या मतदार संघासाठी देव पाण्यात बुडवून असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाला. आता…
डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज !
गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याने सर्वसामान्यांमध्ये त्याची धास्ती, भिती वाढत आहे. डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून बेकायदेशीर कर्जांची ‘ॲप्स’ निर्माण झाली असून ‘डिजिटल ॲरेस्ट’ची प्रकरणे प्रचंड वाढताना दिसत आहेत. जनसामान्यांचे प्रबोधन केले जात असले तरी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सुरक्षा यंत्रणा व धोरणात…
वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
, . मुबई- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे…
पार्ल्यात दुमजली इमारतीची बाल्कनी कोसळून पती – पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील…
कर्नाटकातील संघावरील बंदीला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती
बंगळुरु/सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणं आवश्यक असल्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र…
अपयशी इंटरपोल
इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना! सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत इंतरपोलचे महाअधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी जगभरातील 195 देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर आहेत.पण अशा प्रकारची अधिवेशने घेऊन आणि त्यात गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर केवळ चर्चा करून जगभरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर कुणालाही देता येणार नाही .याचे कारण म्हणजे…
