मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Similar Posts
खासदारकी पाठोपाठ राहुल गांधींचे घरही जाणार
दिल्ली -एका वादग्रस्त विधानाप्रकारणीराहुल गांधी याना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकीची गेली त्यामुळे त्यांना दिल्लीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे खासदारकी बरोबर त्यांचे घरही जाणार आहेगुजरात मधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल२०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते….
संसदेच्या आवारात सत्ताधारी व विरोधकांमध्ये राडा – भाजपचे २ खासदार जखमी ! राहुल गांधीवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली – भाजपने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सकाळी संसदेच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी भाजपने राहुल गांधींवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून दिल्ली पोलीस त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केलीयभारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०९, ११५, ११७,…
म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाखाची फसवणूक
मुंबई -(प्रतिनिधी): नवी मुंबईतील घणसोली गावात राहणाऱ्या एका महिलेला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून उल्का ठाकूर व ईश्वर पुंडलिक तायडे या दोघांनी मिळून रोख २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागिने असे मिळून ३५-४० लाख रुपयांची फसवणूक केली. त्याच्यामुळे आज माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जुबेदा आदम गोठेकर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला
राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट
मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का…
निवडणुकीचा भरला बाजार बंडखोरी आरपार
येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीकडे पाहता, निवडणुकीच्या नावाने जे काही सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायी आहे .यालाच का लोकशाही पद्धतीची निवडणूक म्हणायचे? या निवडणुकीत पक्षाशी बेईमानी करणारे, मतदारांशी गद्दारी करणारे, आणि लोकांना फसवणारे मोठ्या संख्येने निवडणूक लढवत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे मिळून जवळपास 50 बंडखोर…
