मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Similar Posts
वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून राजकीय धमासान
मुंबई : केंद्र शासनाच्या वक्फ़ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसारच वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो, असे स्पष्टीकरण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला
मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच तसेच नोटीस बजावल्या आमदारांवर 12 जुलै पर्यंत कारवाई करू नये असेही न्यायालयाने आदेश दिले आहेतविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती . त्यांनी या नोटिशिला सर्वोच्च न्यायालयात…
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
दिप्ती शर्माची अष्टपैलू खेळीभारताने प्रथमच महिला विश्वचषक जिंकून इतिहास घडवला
मुंबई/नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी…
