मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला
Similar Posts
फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन…
संपतीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल – उद्धव ठाकरे अडचणीत
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपती ची ई डी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दादर येथील गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे मात्र या याचिकेमुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे .अर्थात याचिके मागे…
महाराष्ट्र एकीकरण समिती मधील फुटिमुळे भाजपचा मोठा विजय-बेळगावात मराठी अस्मितेचे पानिपत
बेळगाव/महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात सीमा भागातील मराठी अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या आणि कर्नाटक सरकारशी सातत्याने संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती मध्ये फूट पडुन मते विभागली गेल्यामुळे बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि मराठी अस्मितेचे बेळगावात अक्षरशः पानिपत झाले महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी हा फार मोठा धक्का समजला जास्त आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात बेळगाव हे लढ्याचे मुख्य…
स्वागत नवं वर्षाचे आव्हान परतलेल्या कोरोनाचे
सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना…
काशी पत्रकार संघाच्या पदाधिकान्याची , मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट
मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि…
राजापूर झेड पी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत
राजापूर/राजापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारी ‘मिनी मंत्रालये’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून,आता खरी चुरस गावकुसातील प्रचारात पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट संघर्ष पाहायला मिळत असून, विकासाचे मुद्दे आणि राजकीय वर्चस्व…
