सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व जवानांनी करोना काळात सैन्य दलाच्या विविध रुग्णालयांमधून अद्भुत आरोग्यसेवा प्रदान करत हजारो लोकांना जीवनदान दिले. विविध देशांमधून प्राप्त झालेले ऑक्सिजन सिलेंडर्स व औषधे पोहोचविणारे सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. वीर सेनानी फाउंडेशन या वीर…
मालवण मधील राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवण/बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थ यांच्यामध्ये राजकोट किल्ल्याजवळ जो राडा झाला होता त्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोन्हीकडच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटने प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे तसेच लवकरात लवकर त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल मात्र यावर कोणी राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेमालवण…
शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं – श्रीमती शालिनीताई पाटील
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही….
बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बिर्ला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राजभवन येथे पोस्टेज स्टॅम्पचे अनावरण महात्मा गांधींशी घनिष्ठ संबंध असलेल्या बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली. आपल्या शिक्षण संस्थांमधून बिर्ला समूहाने भारतीय संस्कृती व नितीमूल्ये जोपासल्यामुळे समूहाचे नाव आदराने घेतले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष…
दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा सुळसुळाट मराठी माणसांचे तारणहार आता गप्प का ?- मराठी माणसांचे तारणहार बनलेले शिवसेना आणि मनसेचे लोक कुठे गेले?
मुंबई-/ मराठी माणसांची मुंबईतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या दादर मध्ये सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाई गरीब मराठी फेरीवाल्यांवर होते कारण परप्रांतीय रोहिग्या फेरीवाल्यांचे एक मोठे सिंडिकेट दादर मध्ये सक्रिय आहे. शामसुद्दीन आणि जमाल नावाचे दोन दलाल फेरीवाल्या कडून हप्ते गोळा करतात आणि पालिका लासन्स विभागाला…
नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी- बापाची माघार – बेटा अपक्ष
नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे याना उमेदवारी दिली होती पण त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलेच नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार आहोत असे सांगू लागले इतकेच नव्हे तर पाठींब्यासाठी आपण भाजप नेत्यानाही आग्रह करणार आहोत असे सांगितले आहे त्यामुळे…
