सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
आबू आझमी तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचे जशास तसे उत्तर – अस्लम शेखच्या मालवणीतील कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणीतील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले त्यामुळे मालवणीत तणाव निर्माण झाला होता.मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर आज मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मालवणीत एकत्र जमत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणमुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
पालिकेतील कॅन्टीन मधून भांड्यांची चोरी- जेवण मागवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संशय
मुंबई/ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेत आतापर्यंत अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे उघडकिस येत होते पण आता चोऱ्याही उघडकीस यायला लागल्या आहेत. पालिकेच्या मुखायलायाच्या कॅन्टीन मधून वेगवेगळ्या विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी जेवण किंवा नाश्ता मगवतात पण ज्या भांड्या मधून हे पदार्थ पोचवले जातात ती भांडी काही कर्मचारी कॅन्टीन मध्ये परत न पाठवता चक्क…
