सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर – शुक्रवारी अटल सेतूचे उदघाटन करणार
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी १२. १५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई…
मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष
मालेगाव/ मुंबईतील रेल्वे बॉम्ब स्फोटातील ११ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने याच महिन्यात निर्दोष मुक्त केले होते.त्याच्या काही दिवसातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सातही आरोपींची विशेष न्यायालयाने सबळ पुरावे अभावी १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.मात्र हा निकाल देताना न्यायालयाने तपास व्यवस्थित झाला नाही अशी टिप्पणी करीत, तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत….
राज्य वस्तू संग्रहालयाबाबत तरुणांच्या संकल्पना मागवा ! -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची सूचना
मुंबई, : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभे राहणारे राज्य वस्तू संग्रहालय कसे असावे, याबाबत राज्यातील तरुणांच्या नवनवीन संकल्पना समजून घेणे आवश्यक असून त्यासाठी स्पर्धा आयोजन करावे, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केली. जागतिक वारसा व संग्रहालय दिनानिमित पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय…
एस टी कामगारांची क्रूर थट्टा
दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा नामोनिशाण मिटवून टाकण्याचा गणेश नाईकांचा इशारा महायुतीतील तणाव वाढला
मुंबई/शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अलिकडेच महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. पक्षाने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटवून टाकेन…
