सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
पक्ष बांधणीच्या आड येणाऱ्याला तुडवा – राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
लांजा – सध्या कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाले असून काल लांजा येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष बांधणीवर भर द्या जर कोण आडवा आला तर त्याला तुडवा . मी मुंबई वरून वकिलांची फौज पाठवीन असे आदेश दिले आहेत .: मुंबईच्या नेस्को मैदानावर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रम
मुंबई, दि. २१ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- २०२१च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ सदस्यांसमवेत चहापानाचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.चहापान कार्यक्रमात मंत्रीमंडळातील सदस्य…
शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो…
संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार – निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार,…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंवर गुन्हा दाखल
मुंबई/ औरंगाबादच्या सभेत केलेल्या स्फोटक भाषणं प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दखल होणार आहेत .औरंगाबाद मधील सभेत राज ठाकरे यांनी सभेसाठी घातलेल्या 16 पैकी 12 अटींचे राजने उल्लंघन केले त्यामुळे याबाबतचा अहवाल गृहमंत्र्यांनी मागवला होता तो अहवाल पोलीस…
