सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
धमकी देऊन धर्मांतर करण्याच्या प्रकरणात गौप्यस्फोट! शिकवणीला येणाऱ्या हिंदू मुलीचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा दाखल
अहिल्या नगर/ जिल्ह्यातील जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनभंगाच्या तक्रारीनंतर गावातील…
महाराष्ट्रातील दुकाने हॉटेल्स यापुढे २४ तास उघडी राहणार – बार व दारू दुकानांना वगळले
मुंबई/ सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी…
पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदाराला पळवले आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
बुलढाणा : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला ( पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजनतेचे मरण त्यांचे राजकारण
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महावविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे ती पाहिल्यावर या लोकांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनात जो संताप निर्माण झालाय . त्याचा आगामी निवडणुकीत स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही . कारण जेवढा वेळ हे लोक सहावी जागा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात घालवीत आहेत . तेवढंच वेळ जर यांनी लोकांच्या प्रश्नासाठी दिला असता…
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
