सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
डॉ. दीपक टिळक यांनी तारेवरची कसरत करीत आयुष्यभर कार्य केले ; लोकमान्यांच्या जयंतीदिनी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६९ वी जयंती आज गिरगांव चौपाटीवर स्वराज्य भूमि या त्यांच्या समाधीस्थळी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांची भूमिका साकार करणारे अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री शशांक बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र…
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूचपरभणी: मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला
आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथे २८ वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हा विषय आता वेगळं स्वरूप धारण करतोय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथील रहिवाशी असलेला सोमेश्वर…
मुंबई उपनगर जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या आढाव्याची बैठक घेण्यात आली.
२०१६ च्या सर्वेक्षणात मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४,१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. ही जमीन राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका (BMC), म्हाडा व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९२६ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झाले असून, ३२२ प्रगतीपथावर आहेत. ११४ प्रकल्प विविध कारणांमुळे स्थगित आहेत. या प्रकल्पांतून १,७५,५११…
दिल्लीतील स्वामी चैत्यनंदचे सेक्स स्कँडल! आश्रमातील १७ विद्यार्थिनीं कडून पोलखोल
नवी दिल्ली/स्वामी चैतन्यनंद सरस्वती पार्थ सारथी यांच्यावर श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थिनींसाठी अपशब्द वापरले आणि त्यांना व्हॉट्सअॅप, एसएमएसद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएमच्या विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक छळ आणि फसवणुकीच्या आरोपांची आता दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. श्री श्रृंगेरी मठ…
देशातील ३३४ पक्षांची मान्यता रद्द!निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली/केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील ३३४ नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (आर यू पी पी एस) निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
