मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते
Similar Posts
अष्टपैलू लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
क्रिकेटचा सामना आपल्या लेखाने जिवंत करणारे, आपल्या नजाकतभर्या शैलीने वाचकांना प्रवासवर्णनातून जगभ्रमंती घडवून आणणारे, आपल्या मिश्किल शैलीत सिनेमा आणि सिनेकलाकारांचे चकचकीत विश्व उभे करणारे आलराऊंडर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, प्रसिद्ध सिनेनिवेदक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्मानिय सदस्य द्वारकानाथ संझगिरी यांची कर्करोगाविरुद्ध सुरु असलेली झुंज अखेर आज अपेशी ठरली. आज सकाळी त्यांचे वयाच्या ७४ व्या…
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेच्या हालचाली ?
नवी दिल्ली/उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याची तयारी चालवली असल्याचे समजते.त्यासाठीच ते सतत दिल्ली वाऱ्या करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिंदे गेल्या महिन्याभरात तीनदा दिल्लीला गेले आहेत. यातील आधीच्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांनी मोदी, शहांची…
राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा- महापौर
मुंबई/ माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉक डाऊन पासून आता पर्यंत कधीच मास्क वापरला नव्हता मात्र त्यामुळेच कदाचित त्यांना कोरोणाणें गाठले असावे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत यावर बोलताना मुंबई चां महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की करोनाच्या .संकट काळात मास्क हे सुरक्षा कवच आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला
राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
जीवाला धोका असल्याच्या दाव्यातून राहुल गांधींची माघार
पुणे/काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे…
