कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे उध्वस्त झाला गिरण्या बंद पडल्याने मुंबईतील घरदार विकून लोक गावी गेले तर काहींनी मुंबईच्या बाहेर जाणे पसंत केले पण मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत असताना कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला मदतीचा हात दिला नाही ही आहे मुंबईतील मराठी माणसाची शोकांतिका आज महाराष्ट्राच्या या राजधानीत मराठी माणूस आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय कारण त्याने लढून मिळवलेली मुंबई त्याच्या हातून कधीच गेली मुंबईत मराठी माणूस केवळ इतिहासाच्या पानावराच दिसणार आहे .उर्वरित महाराष्ट्राची सुधा हीच स्थिती आहे निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची अनास्था यामुळे बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील 42हजार कर्जबाजारी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत ग्रामीण भागात शेतीला पर्यायी व्यवस्थाच नसल्याने शेतकरी हवालदिल झालंय गेल्या साठ वर्षांत येथे वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक शरद पवार यांच्या सारखे कर्तबगार नेते मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे पुरेसे औद्योगीकरण झाले नाही किंवा शेती व्यवसायातही काही अमुलाग्र बदल झाले नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही परिणामी फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी कर्जाच्या दुष्ट चक्रातून बाहेर रिवर्ही शकला नाही दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असताना नेते मंडळी मात्र रिकाम्या हाताने शेताच्या बांधावर फेरफटका मारायला जाताना दिसत होती पण यावेळी शेतकर्याच्या मुलाला दोन रुपयाचे चने शेंगदाणे देण्याचे सुधा त्यांनी औदार्य दाखवले नाही की आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची विचारपूस करायला जाताना शेतकर्याच्या विधवा पत्नीला शे दोनशे रुपयांची कुणी दिली नाही आणि अशा पुढार्यांच्या हाती आमचा महाराष्ट्र आहे साठ वर्षांच्या नंतरही मागे वळून पाहिल्यावर जर अंधार दिसत असेल तर राज्यकर्त्यांनी इतकी वर्ष काय केलं आणि कुठे नेवून ठेवला माझा महाराष्टॄ असा प्रश्न आज लोक विचारात आहेत एक मे म्हणजेच महाराष्ट्र दीन! या दिनाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दिवस कामगार दीन म्हणूनही साजरा केला जातो पण आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कामगारांची दुर्दशा पाहिल्यावर खरोखरच हा दिवस साजरा करण्याची नैतिकता आमच्यात आणि खास करून इथल्या राजकारण्यांमध्ये उरली आहे का हाच खरा प्रश्न आहे.मूठभर मावळ्यांना सोबत घेवून बलाढ्य आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांशी संघर्ष करून स्वराज्याचे तोरण बांधणार्या शिवप्रभुवचा हा महाराष्ट्र ! वर्ण व्यवस्थेवर घाला घालून एका मोठ्या उपेक्षित समाजाला त्याचा न्याय हक्क मिळवून देवून त्याला देशाच्या मुळ प्रवाहात आणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज ,ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या थोर समाज सुधाकराचां हा महाराष्ट्र आज कुठे आणि कसा असायला हवा होता कला, क्रीडा, संस्कृती, शौर्य, प्रतिभा,आदी ज्ञरीहररींहळ महाराष्ट्र मागे नव्हता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशातील सर्वाधिक प्रगात राज्य अशी महाराष्ट्राची ख्याती होती पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राची ही ओळख पुसली गेलीय कारण इथल्या राजकारण्यांनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी महाराष्ट्राला विकून खायचे बाकी ठेवले आहे .आज महाराष्ट्रावर सहा लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज कोणी कशासाठी घेतले त्यातून महाराष्ट्राचा किती विकास झाला किती प्रकल्प उभे राहिले किती लोकांना रोजगार मिळाला या बद्दल राज्यातील जनतेला काहीच ठावूक नाही मात्र हे कर्ज जनतेने फेडायचे आहे.अशी अवस्था आहे या महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला.मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली तर महाराष्ट्राची राजधानी झाली पण या राजधानीची आज धर्मशाळा झाली आहे देशाच्या काना कोपर्यातून कुणीही येतो कुठेही तंबू ठोकतो मिळेल त्या मोकळ्या जागेवर पथारी पसरतो त्यामुळे मुंबईत ना फुटपाथ शिल्लक राहिली आहे ना खेळाची मैदाने! पण कुणालाच त्याचे काही सोयर सुतक नाही मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरांची सुधा तशीच स्थिती आहेत शहरांचे औद्योगीकरण होत असल्याने शहरे कशीही वेडी वाकडी वाढत चालली आहेत आणि या वाढत चाललेल्या शहरांना नागरी सुविधा पुरवताना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकी दम येतोय.खरे तर उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य होते पण आज नवीन उद्योग येण्याचे सोडाच इथे असलेले उद्योग धंदे सुधा दुसर्या राज्यात जात आहेत त्यामुळे इथल्या स्थानिक जनतेवर बेरोजगार होण्याची पाळी आलीय.आज कामगार दीन पण कामगारांची काय अवस्था आहे
Similar Posts
आषाढी एकादशी निमित्त-खेळ मांडियेला
महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत.मध्ययुगीन प्रबोधन…
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
भाजपचा कार्यक्रमात कुख्यात गुंडांच्या पत्नीचे शक्तिप्रदर्शन
पुणे/ महा विकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमात दोन कुख्यात गुंडांच्या पत्निनी शक्ती प्रदर्शन केले पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि शरद लांडे यांची पत्नी गायत्री लांडे या दोघींनी चंद्रकांत दादांच्या कार्यक्रमात आपल्या अनेक महिला समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले तसेच…
घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
संदीप बाळासाहेब बर्गे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात…
शिक्षण विभागाचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू
मुंबई/ गेल्या दीड वर्षांपासून करोना भीतीमुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जी प्रस्ताव पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे . त्यामुळे येत्या ४ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेतकोरोणा मुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून शाळा कॉलेज बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन…
