कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे उध्वस्त झाला गिरण्या बंद पडल्याने मुंबईतील घरदार विकून लोक गावी गेले तर काहींनी मुंबईच्या बाहेर जाणे पसंत केले पण मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत असताना कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला मदतीचा हात दिला नाही ही आहे मुंबईतील मराठी माणसाची शोकांतिका आज महाराष्ट्राच्या या राजधानीत मराठी माणूस आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय कारण त्याने लढून मिळवलेली मुंबई त्याच्या हातून कधीच गेली मुंबईत मराठी माणूस केवळ इतिहासाच्या पानावराच दिसणार आहे .उर्वरित महाराष्ट्राची सुधा हीच स्थिती आहे निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची अनास्था यामुळे बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील 42हजार कर्जबाजारी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत ग्रामीण भागात शेतीला पर्यायी व्यवस्थाच नसल्याने शेतकरी हवालदिल झालंय गेल्या साठ वर्षांत येथे वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक शरद पवार यांच्या सारखे कर्तबगार नेते मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे पुरेसे औद्योगीकरण झाले नाही किंवा शेती व्यवसायातही काही अमुलाग्र बदल झाले नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही परिणामी फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी कर्जाच्या दुष्ट चक्रातून बाहेर रिवर्ही शकला नाही दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असताना नेते मंडळी मात्र रिकाम्या हाताने शेताच्या बांधावर फेरफटका मारायला जाताना दिसत होती पण यावेळी शेतकर्याच्या मुलाला दोन रुपयाचे चने शेंगदाणे देण्याचे सुधा त्यांनी औदार्य दाखवले नाही की आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची विचारपूस करायला जाताना शेतकर्याच्या विधवा पत्नीला शे दोनशे रुपयांची कुणी दिली नाही आणि अशा पुढार्यांच्या हाती आमचा महाराष्ट्र आहे साठ वर्षांच्या नंतरही मागे वळून पाहिल्यावर जर अंधार दिसत असेल तर राज्यकर्त्यांनी इतकी वर्ष काय केलं आणि कुठे नेवून ठेवला माझा महाराष्टॄ असा प्रश्न आज लोक विचारात आहेत एक मे म्हणजेच महाराष्ट्र दीन! या दिनाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दिवस कामगार दीन म्हणूनही साजरा केला जातो पण आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कामगारांची दुर्दशा पाहिल्यावर खरोखरच हा दिवस साजरा करण्याची नैतिकता आमच्यात आणि खास करून इथल्या राजकारण्यांमध्ये उरली आहे का हाच खरा प्रश्न आहे.मूठभर मावळ्यांना सोबत घेवून बलाढ्य आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांशी संघर्ष करून स्वराज्याचे तोरण बांधणार्या शिवप्रभुवचा हा महाराष्ट्र ! वर्ण व्यवस्थेवर घाला घालून एका मोठ्या उपेक्षित समाजाला त्याचा न्याय हक्क मिळवून देवून त्याला देशाच्या मुळ प्रवाहात आणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज ,ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या थोर समाज सुधाकराचां हा महाराष्ट्र आज कुठे आणि कसा असायला हवा होता कला, क्रीडा, संस्कृती, शौर्य, प्रतिभा,आदी ज्ञरीहररींहळ महाराष्ट्र मागे नव्हता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशातील सर्वाधिक प्रगात राज्य अशी महाराष्ट्राची ख्याती होती पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राची ही ओळख पुसली गेलीय कारण इथल्या राजकारण्यांनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी महाराष्ट्राला विकून खायचे बाकी ठेवले आहे .आज महाराष्ट्रावर सहा लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज कोणी कशासाठी घेतले त्यातून महाराष्ट्राचा किती विकास झाला किती प्रकल्प उभे राहिले किती लोकांना रोजगार मिळाला या बद्दल राज्यातील जनतेला काहीच ठावूक नाही मात्र हे कर्ज जनतेने फेडायचे आहे.अशी अवस्था आहे या महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला.मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली तर महाराष्ट्राची राजधानी झाली पण या राजधानीची आज धर्मशाळा झाली आहे देशाच्या काना कोपर्यातून कुणीही येतो कुठेही तंबू ठोकतो मिळेल त्या मोकळ्या जागेवर पथारी पसरतो त्यामुळे मुंबईत ना फुटपाथ शिल्लक राहिली आहे ना खेळाची मैदाने! पण कुणालाच त्याचे काही सोयर सुतक नाही मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरांची सुधा तशीच स्थिती आहेत शहरांचे औद्योगीकरण होत असल्याने शहरे कशीही वेडी वाकडी वाढत चालली आहेत आणि या वाढत चाललेल्या शहरांना नागरी सुविधा पुरवताना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकी दम येतोय.खरे तर उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य होते पण आज नवीन उद्योग येण्याचे सोडाच इथे असलेले उद्योग धंदे सुधा दुसर्या राज्यात जात आहेत त्यामुळे इथल्या स्थानिक जनतेवर बेरोजगार होण्याची पाळी आलीय.आज कामगार दीन पण कामगारांची काय अवस्था आहे
Similar Posts
हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
परमवीर सिंग अहमदाबाद मधून भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाला- नाना पाटोळे
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात एक प्रमुख आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गुजरात मधील अहमदाबाद येथून परदेशात पळाले त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना परमवीर सिंग हे सापडल्यास अनेक गोष्टी उजेडात येतील आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
