मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…
हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
७९ वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा
नवी दिल्ली/ यंदाचा ७९ वा स्वातंत्र्य दीन देशभर उत्साहात साजरा झाला.पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटांचा केलेल्या भाषणात ऑपरेशन सिन्दुर मधील वीर जवानांचे तोंडभरून कौतुक केले. देशाच्या सर्व राज्यांमध्ये त्यात्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन केले यावेळी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा घोषणाही करण्यात आल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी…
बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता
शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास पेपर तपासणीवर बहिष्कारराज्यात महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. आता, या परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बारावीच्या परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास त्याचा थेट परिणाम…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयत्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ प्रकरणी फडणवीस यांची चौकशी
मुंबई/ गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्या संपूर्ण कटाचा व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह सभापतींना दिला होता त्याबाबत फडणवीसांचा फक्त जवाब नोंदवण्यात आला मात्र त्याचे भाजप कडून सध्या राजकारण केले जात असून जणू काही फडणवीस याना अटक झाली अशा प्रकारे भाजपकडून…
निवडणूकीचे बिगुल वाजले – महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल
मुंबई/ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले.आज निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला..निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी, निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना,23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील २९ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख,30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी.४ नोव्हेंबर अर्ज…
