मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
केंद्राकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे अमित शहांचे आश्वासन
नाशिक/ अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार तातडीने मदत देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिलेगेल्या महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री…
अखेर किरण गोसविला अटक
मुंबई/ आर्यन ड्रग प्रकरणातील फरारी साक्षीदार किरण गोसावी याला अखेर आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान गोसाविला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहेक्रुझ वरील रेड च्या वेळेस एन सी बी ने किरणला पंच बनवले होते यावेळी त्याने आर्यन सोबत एक व्हिडिओ काढला होता गोसावी आणि भाजप कार्यकर्त्याला पंच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआदित्य ठाकरेंच्या सभेत राडा
वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं…
