कणकवली/ अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे पाहून मयव म्यव करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षाने निलंबित करण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते सतिश परब यांनी झालेल्या मारहाणच्या प्रकरणी नितेश राणेंचे नाव आल्याने व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.या प्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहेे. मात्र काल सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होतो की त्यांना अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र दोन्हीकडून वकिलांची फौज उभी आहे नितेश राणे यांच्याकडून ad. संग्राम देसाई आणि त्यांचे पाच सहकारी तर सरकारी पक्षाकडून ad. घरत आणि त्यांचे सहकारी न्यायालयात युक्तिवाद करत आहेत शिवसेना कार्यकर्ते सतीश परब मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या करणे त्यांना धडक देऊन खाली पडले त्यानंतर कारमधून उतरलेले गोत्ये आणि त्याच्या साथीदारांनी तू सतीश सावंत साठी काम करतोस का असे विचारून त्याच्यावर हल्ला केला होता यात परब जखमी झाला होताा. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी नितेशला कळवा काम झाले असे शब्द उच्चारले होते त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे अडकले आहेत.
Similar Posts
पाकिस्तानी हेर ज्योतीविरुद्ध सबळ पुरावे सापडले २५०० पानाचे आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली/मागील काही महिन्यांपूर्वी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आता तिच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडले आहेत. ज्योती मल्होत्रावरपाकिस्तानविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तीन महिन्यांच्या चौकशीनंतर २५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्योती मल्होत्रा उर्फ ज्योती राणी हिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे युट्यूब चॅनल होते….
वसई किल्ल्यात मराठी विरुद्ध हिंदी वरुण वाद!शिवाजी महाराजांच्या वेशात फोटो काढण्यास रखवालदारांचा विरोध
वसई/मराठी विरुद्ध हिंदी हा भाषिक वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. देशभरातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्राची मातृभाषा असलेली मराठी शिकण्यास विरोध करतात, असा आरोप मराठी लोकांकडून केला जातो. तर दुसरीकडे, काही हिंदी भाषिक परप्रांतीय म्हणतात की, “महाराष्ट्र भारतातच आहे, आणि हिंदी ही भारताची भाषा आहे, त्यामुळे आम्ही हिंदीतच बोलणार.”असा हट्ट करतातया…
राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य
राज्य सरकारचा मोठा निर्णयसरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हा ऍक्ट ऑफ गॉड – आरोपी भिडेने चक्क देवाला जबाबदार धरले
मुंबई : घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक कोसळण्याची घटना ही नियती होती,हा ऍक्ट ऑफ गॉड आहे. कारण सोअसत्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हि दैवी शक्ती होती त्यामुळे होर्डिंग पडले असा अजब दावा करीत आरोपी भिडेने आपल्याला या गुन्ह्यातून मुक्त करण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे. जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली…
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
