लॉकडाऊन/अनलॉकच्या वातावरणात दूरदर्शनवर रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या रामायण, महाभारत या सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या ऐतिहासिक, पौराणिक मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले. रामानंद सागर यांची श्रीकृष्ण ही मालिका तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सर्वदमन बँनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका वठविली असून आता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करीत आहेत. श्रीकृष्णाने आपले विराट स्वरूप दाखविले आहे आणि जीवन जगण्याची संपूर्ण कार्यपद्धती विषद केली आहे. यात निष्काम कर्मयोग हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. श्रीमद्भगवद्गीता हे संपूर्ण जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन, दिशा दिग्दर्शन आहे. आजच्या कलीयुगात हे सर्व सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असं असलं तरी समाजात आजही काही व्यक्ती अशा आहेत की ज्यायोगे भगवान श्रीकृष्ण यांचा संदेश तंतोतंत अंमलात आला आहे, असे दिसून येते. यातच एक व्यक्ती म्हणजे कृष्णाभाऊ शेवडीकर ! माझ्या पेक्षा एकवर्ष दहा दिवस कृष्णाभाऊ मोठे असले तरी ते अन्य मित्रांप्रमाणे मला ‘गुरुजी’, ‘गुरुवर्य’ म्हणतात , हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. कृष्णाभाऊ हे खरोखरच निष्काम कर्मयोगी आहेत. मराठवाड्यात नांदेड येथून श्रमिक एकजूट हे दैनिक गेल्या पन्नास वर्षापासून नित्यनियमाने ते चालवितात आणि संपूर्ण मराठवाडा त्यांनी व्यापलेला आहे. पत्रकार हा खरा समाजसेवक असतो. तो समाजाचा आरसा असतो. आपण बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची परंपरा सांगतो. अगदी आताआतापर्यंत पत्रकारिता कशी करावी याचा मापदंड असलेले दिनू रणदिवे, मधू शेट्ये काळाच्या पडद्याआड गेले. ‘पत्रकारिता हे सतीचे वाण’, ‘पत्रकारिता म्हणजे असिधारा व्रत’ हे आता केवळ बोलण्यापुरते, ऐकण्यापुरते म्हणावे लागेल. पण नाही, हे जर खऱ्याअर्थाने आपल्याला पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल. कृष्णाभाऊ यांचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा, कधीही कुणावर रागावलेले त्यांना पाहिलेले नाही. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार. आणि हे मी तुमच्या साठी केले असे कधीच ते दाखवून देणार नाहीत, भासवून देणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण यांचा कर्मण्येवाधिकारस्ते हा मूलमंत्र ते खऱ्याअर्थाने पाळतात म्हणण्यापेक्षा तो मंत्र ते खऱ्याअर्थाने जगत आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि आहुतिकार वसंतराव त्रिवेदी म्हणजे माझे वडील यांच्या समवेत कृष्णाभाऊ शेवडीकर आणि रवींद्र बेडकीहाळ यांनी पत्रकार परिषदेत एकत्र काम केले आहे. सोलापूरच्या रंगाआण्णा वैद्य, अमरावती चै बाळासाहेब मराठे, बेळगावच्या बाबूराव ठाकूर, पुण्याचे वसंतराव काणे, नांदेडचेच सुधाकरराव डोईफोडे, सूर्यकांता पाटील, रायगडच्या मिनाक्षीताई पाटील, जळगावचे ब्रिजलालभाऊ पाटील, धुळ्याचे भाई मदाने, मुंबई चे कुमार कदम, यशवंत उर्फ नाना मोने, नाशिक चे चंदुलाल शाह अशा अनेकांबरोबर कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. स्वतः चे दैनिक एकीकडे नियमित चालवितांनाच दुसरीकडे पत्रकारांच्या, वर्तमानपत्रांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी शेवडीकर बेडकीहाळ जोडीने अथक परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तसेच संपादक परिषद सुद्धा यशस्वी पणे हे दोघे सांभाळतात. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने माझी शिफारस केल्यामुळे मला राज्य अधिस्वीकृती समितीवर काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने यदूनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली कृष्णाभाऊ शेवडीकर, रवींद्र बेडकीहाळ, विलासराव मराठे, सुधीर महाजन, प्रकाश कुलथे, धनंजय जाधव, प्रसाद काथे, विनोद जगदाळे, शंतनू डोईफोडे अशा अनेकांबरोबर काम करण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या स्वभाव गुणांचा परिचय झाला. याच निमित्ताने मी श्रमिक एकजूट या दैनिकाचा लेखक म्हणून परिचित झालो. कृष्णाभाऊ यांच्या श्रमिक एकजूट मुळे (आधीच ज्या मराठवाड्यात दैनिक सामना मुळे परिचित झालो होतो तो आणखीनच) मराठवाड्यात माझा नावलौकिक सर्वदूर पोहोचला. शतकवीर संसदपटू केशवराव धोंडगे या महाराष्ट्रात एक काळ गाजवलेल्या नेत्यांनी ४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी मला भ्रमणध्वनी वरुन, “देवा, आपण आमची जाणीव ठेवलीत” असे सांगितले. माझी पत्रकारिता खऱ्याअर्थाने धन्य झाली. ज्या केशवराव धोंडगे यांनी लोकसभा आणि विधानसभा गाजविल्या, त्या सभागृहात त्यांचे कार्य जवळून पाहण्याची संधी सामनामुळे उपलब्ध झाली. त्याच केशवरावांकडे त्यांच्याच शेतकरी कामगार पक्ष आणि सरकारने दुर्लक्ष केले ही बाब मी श्रमिक एकजूट च्या माध्यमातून समोर आणतांना ‘दिवंगतांची जन्मशताब्दी जोरात आणि हयात शतकवीर कोनाड्यात’ असे प्रहार केले. या बद्दल केशवरावांनी माझे कौतुक करुन शाबासकीची थाप मारली, याचे संपूर्ण श्रेय खऱ्याअर्थाने कृष्णाभाऊ शेवडीकर यांनाच द्यावे लागेल. याच लेखावर दत्तात्रय कराळे या ज्येष्ठ पत्रकार यांची विस्तृत प्रतिक्रिया सुद्धा कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी श्रमिक एकजूट मध्ये प्रसिद्ध केली. विजय वैद्य, गिरीश त्रिवेदी, प्रवीण कारखानीस, वीणा गावडे, शशीकला रेवणकर, रेखाताई बोऱ्हाडे, प्रा. नयना रेगे, सुजाता जोग, जयंत करंजवकर, खंडुराज गायकवाड, किशोर आपटे, सुहास पटवर्धन, विजय शिंदे, हेमंत थोरवे, वंदना साळसकर साखळे, अजय वैद्य, मनीषा रेगे, दिलीप मालवणकर ही मंडळी सुद्धा श्रमिक एकजूट च्या परिवारात जोडली गेली. निष्काम कर्मयोगी म्हणून मी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना म्हणतो त्याचे कारण त्यांनी आपला आदर्श डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना मानले आहे. महाराष्ट्र भूषण बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा जे खऱ्याअर्थाने चालवितात त्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना आजच्या भाषेत आपला आयडॉल, रियल हिरो म्हणून जर कृष्णाभाऊ आपला आदर्श मानत असतील तर कृष्णाभाऊ हे निष्काम कर्मयोगी निश्चितच बनू शकतात, नव्हे मी तर त्यांना नक्कीच ही बिरुदावली त्यांच्या नावापुढे लावेन. अशा या ज्येष्ठ पत्रकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ विनम्रपणे नाकारला आहे. सोयी, सवलतीच्या मागे धावणाऱ्यांच्या जमान्यात विनम्रपणे लाभ नाकारणारा कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या सारखी व्यक्ती निश्चितच आदरास पात्र ठरते अभिमानास पात्र ठरते. श्रमिक एकजूट आणि कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या मुळे नांदेड येथील डॉ. विलास कुमठेकर यांच्या सारख्या एका प्रकांडपंडिताचा परिचय झाला. त्यांचे आणि माझे सतत बोलणे सुरु असते. या बोलण्यातून कृष्णाभाऊ शेवडीकर यांचा संदर्भ, उल्लेख हमखास येणारच. नांदेड चे हे दोघे राम लक्ष्मण म्हणायला हवेत. अशा या निष्काम कर्मयोगी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, श्रमिक एकजूट ची पताका दिमाखदार पणे फडकत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा !- योगेश वसंत त्रिवेदी,
Similar Posts
बाबासाहेब पुरंदरे : अगणितांचा आधारवड ! –
श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या वयाच्या बरोब्बर शंभराव्या वर्षी देह ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या शिवस्रुष्टीत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे उभ्या हिंदुस्थानातच नव्हे तर साऱ्या जगभरात पारायण केले. घरोघरी शिवरायांचे शौर्य, शिवनीति, शिवविचार, शिवचरित्र पोहोचविले. महाराष्ट्रात शिवसृष्टी उभी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेब अक्षरशः शिवकाळ जगले. स्वतः बरोबरच शिवभक्तांना…
कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे ‘मळभ कोरोना’चे वाचनीय पुस्तक ; आशुतोष कुंभकोणी ; माजी आरोग्य मंत्र्यांच्या अनुभवातून झालेली निर्मिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :-गेली दीड वर्षे भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे.मात्र याबद्दल अचूक व अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या लेखांचा संग्रह असणारे लेखक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लिहिलेले कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे मळम कोरोनाचे पुस्तक आहे अश्या शब्दात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गौवोद्गार काढले.विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ हॉल मध्ये कोरोनाचे नियम…
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
मनाला आवरायला, जोडायला, सजवायला, सावरायला शिका तरच जीवन सुखी होईल ; जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांचे मार्गदर्शन ; अमेरिकेतील ‘आमी परिवार ग्लोबल टॉक शो’ फेसबुक लाईव्ह मध्ये विशेष अतिथी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अमेरिकेतील ‘आमी परिवार’ म्हणजेच अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारातर्फे आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह ‘ग्लोबल टॉक शो’ मध्ये ‘मनावर घ्या’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्येचे आजीव विश्वस्त आणि सदगुरू श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र श्री. प्रल्हाददादा पै यांना निमंत्रित करण्यात आले होते. या टॉक शो मध्ये श्री. प्रल्हाददादा पै यांनी ‘मन’ ह्या…
ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय | विश्लेषणशुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
