स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.
Similar Posts
इराण/ इस्रायल युद्धाचे महायुध्दात रुपांतर होणार?
तेहरान/इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे. लांब पल्ल्याच्या मिसाईल इंटरसेप्टरचा पुरवठा कमी झाल्यानं हवाई सुरक्षेची चिंता वाढली आहे. अमेरिकेची मदत न मिळाल्यास इस्रायल अडचणीत येऊ शकतो. कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केली होती, त्यामुळे आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र भारताचे ज्ञान आणि इस्रायल या दोन्ही देशांची अत्यंत चांगले संबंध…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
पालिकेचे री ऍक्टिव्ह अस्फाल्ट गेले पावसाच्या पाण्यात वाहून -दादरच्या मारुती मंदिराजवळील खड्डे तसेच कायम
मुंबई/दादर पश्चिम येथील मारुती मंदिर हा परिसर नेहमीच वर्गणीचा असतो त्यामुळे इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणि हाच भर पडलेला आहे पालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी री ऍक्टिव्ह अस्फाल्ट नावाचे तंत्रज्ञान वापरून हे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाखो रुपये खर्चून हे तंत्रज्ञान वापरून सुद्धा मारुती मंदिराजवळील खड्डे आहेत…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
आदित्य ठाकरे च्या वरळी मतदार संघातील कार्यकर्ते मनसेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करीत आहेत तसेच केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचे दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मतदार संघनिहाय सर्व माहिती घेतली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत मोठी ताकद आहे…
दिल्ली महापालिकेवर आपचा झेंडा- भाजपची 15 वर्षांची सत्ता गेली
दिल्ली/ ज्या दिल्ली महापालिकेवर गेली 15 वर्ष भाजपची सत्ता होती तिथे आता सत्तांतर झाले असून तिथे आम् आदमी पक्षाची सत्ता आली आहे. 4 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीचा निकाल लागला आणि आम् आदमी पक्षाने सर्वाधिक 134 जागा जिंकून महापालिका काबीज केली तर भाजपला 104 जागा मिळाल्या काँग्रेसला केवळ 9…
