स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.
Similar Posts
अनिल परब यांना आणखी एक धक्का तिकीट यंत्र खरेदी केल्याप्रकरणी लोकायुक्त चौकशी करणार
: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली…
हिंदीच्या सक्तीप्रकरणी शिक्षणमंत्री राज ठाकरेंना भेटणार
मुंबई/महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीला मनसेने विरोध केल्यानंतर ,आता इतरही पक्ष हिंदीच्या विरोधात उभे राहिले आहेत. शरद पवार यांनीही लहान विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेची सक्ती नको अशी मागणी केली आहे. तर यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.राज्याचे नवे शैक्षणिक वर्ष गेल्या आठवडचात दि.१६ जूनपासून सुरु झाले….
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत भाजपचे फटाके- राहुल गांधी संतप्त
बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या…
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या टाकल्या होत्या ना… मंत्रालयात लावलेल्या जाळ्यात उड्या टाकणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना राज ठाकरेंचा टोला
मुंबई/धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये तसेच पेसा अंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी आज मंत्रालयातील लावलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरून आंदोलन केले यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आमदार डॉक्टर किरण लहाने काशीराम पावरा हिरामण भोसकर राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांचा समावेश होता त्यांचे हे आंदोलन मंत्रालयात खळबळ उडवून देणारे…
ठाकरेंना दुहेरी झटका- निकटवर्तीयांच्या घरावर ईडीच्या धाडी -ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेतही कपात
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आज दुहेरी झटका बसला आहे एकीकडे त्यांच्या निकटवर्तीयांच्या १७ ठिकाणांवर ईडीने कोविड काळातील कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी छापे टाकले त्यात सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. तर राऊतांचे खास असलेले सुजित पाटकर यांच्यावर छापे टाकण्यात आले. तर संध्याकाळी ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.अशा परिस्थितीत मुंबईतून मोठी बातमी…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
