स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.
Similar Posts
पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होणार ?
नवी दिल्ली/विरोधी पक्षाने मत चोरीच्या विरुद्ध आंदोलन छेडले आहे.तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोग पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी करणार असल्याचे समजते.केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय…
महायुती चार जागांवरून तिढा कायम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक
मुंबई/महाविकास आघाडी प्रमाणेच सत्ताधारी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जाग्यांवरून तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली परंतु त्यातून ही काही मार्ग निघालेल्या नाही. त्यामुळे या चार जागा कोणाकोणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता…
गुंडा ही सपाची परंपरा योगींचा अखिलेश वर आरोप
गोरखपूर- पूर्व उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासात आज(दि.४) एक अतिशय महत्त्वाचा दिवस होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण) क्षेत्रात २२५१ कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. गुंतवणूक प्रकल्पांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी कोका कोलाच्या बॉटलिंग प्लांटचा भूमिपूजन समारंभ आणि देशातील आघाडीची प्लास्टिक उत्पादन-पॅकेजिंग कंपनी टेक्नोप्लास्टच्या युनिटचे उद्घाटन यांचा समावेश आहे. यानिमित्त…
तर तुला चपलेने मारू!लालूच्या मुलीने राजकारण आणि कुटुंबाची साथ सोडली
..पाटणा/ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली…
नेपाळमध्ये बस नदीत कोसळून २७ ठार – बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील
काठमांडू – महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये ४० प्रवासी होते. या अपघातात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत…
कुणाचा बाप काढू नका फडणवीस यांनी नितेश राणेला झापले
मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचं वारंवार दिसून येतं. यापूर्वी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्यामुळे, तसेच नागपूर येथील हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज दिली होती. त्यानंतर, आता महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र…
