स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.
Similar Posts
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
भाजपच्या माजी मंत्र्यांकडून मिरजचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख !
मिरज – राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सांगली शहरात हिंदू गर्जना सभेत ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्याचं संरक्षण आम्ही करणार असं म्हटलं आहे. त्याच सभेत माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी मिरजची थेट मिनी पाकिस्तान म्हणून तुलना केली आहे. यामुळे आता…
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा महाराष्ट्रालाही फायदा होणार
मध्य प्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षणदिल्ली/ मध्य प्रदेश सरकारने मागासवर्ग आयोगाचा जी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता मान्य करून न्यायलयाने मध्य परदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे .त्यामुळे या निकालाने महाराष्ट्राच्या सुधा आशा पल्लवित झाल्या असून महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणा नुसताच आगामी निवडणुका होतील असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे .मध्य प्रदेशात…
नोटाबंदीवरील न्यायालयीन निर्णयाचा बोध महत्वाचा !
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षे प्रलंबित असलेल्या नोटाबंदीवरील निर्णयावर न्यायालयीन पडदा पडला. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल ४ विरुद्ध १ अशा बहुमताने दिला. एका न्यायमूर्तींनी नोटाबंदीच्या विरुद्ध मत दिले. यानिमित्ताने नोटाबंदीची प्रक्रिया व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबाबतचा उहापोह. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून चलनातील ५०० आणि १००० …
सोनाली देशमाने रिफ्रेशिंग ब्युटी आणि डिजीटल क्वीन
मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन स्पर्धेत भारतातील ५४ सौंदर्यवतींचा सहभाग मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी)- शारिरीक सौंदर्याला लाभलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्या डिजीटल युगात सामाजिक जाणीवांची जनजागृती करण्याच्या वसा घेतलेल्या मुंबईकर सोनाली देशमाने हिने दिवा ब्युटी पेजेंट्स मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशनच्या पाचव्या सीझनमध्ये ‘रिफ्रेशिंग ब्यूटी आणि डिजीटल क्वीन’ हा पुरस्कार पटकावला. भारताच्या कानकोपर्यातून आलेल्या…
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार
पुणे – मनसे चे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिवले यांच्यावर गोळीबार करण्यात आला सुदैवाने ते बचावले आहेत मात्र या घटनेने संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ माजलेली आहे या प्रकरणी . राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस…
